वेळापत्रकाप्रमाने जरी शाळा भरली असली तरी जो पर्यंत शिक्षक वर्गात येत नाहीत तो पर्यंत खऱ्या अर्थानेशाळा भरत नाही. आमची पहिलीच batch होती ती semi-English ची, म्हणजे आम्ही पाचवी ला गेलो आणि Semi-English चालु झालं. म्हणजे काय ३ विषय मराठी भाषेतून आणि ३ विषय English मधुन. शिक्षकांना वाटले आताच पोरं मराठीतून English कडे वळलेत थोडीशी सूट द्यावी त्यांना. तो पाचवीचा आमचा वर्ग खुप लाकडा होता पुर्ण शाळेचा. मस्ती तर खुपच करायचा तेवढाच हुषार पण होता.
वर्गातला ती पहिली तासिका नेहमीच वर्ग शिक्षकांची असायची. डस्टर आपटल्याचा आवाज आला की शिक्षक वर्गात आलेत असं कळायच. त्या डस्टरच्या आवाजानेच मित्रांशी गप्पा मारणारा बेसावध मुलगा भानावर येउन सर्वात शेवटी उभा राहतो. त्याचे उभे राहणे आणि आणि इतरांचे खाली बसणे एकाच वेळी झाले की वर्गात हास्यकळोळ व्हायचा. हजेरी सुरू व्हायची. काही वेळेस नावं वाचून हजेरी घ्यायचे शिक्षक नाहीतर काहीवेळा हजेरी क्रमांका वरून. शिक्षकांच्या नजरा खाली असल्यावर ‘हजर’ आणि ‘गैरहजर’ बोलायला मजा यायची. काहीवेळा तर दूसऱ्यांची हजेरी द्यायचो आम्ही.
मुलांचे वाचन किती आहे आणि ते वाढावे, त्यांना नविन शब्दांचीच ओळख व्हावी, म्हणू आणि वाकप्रचार स्वत:हून वाक्यात उपयोग करणे अशी काही ‘निबंध’ लिहीण्यामागे कारण असतं. मात्र शाळेच्या मुलाच निबंध वाचले की त्यांचे वाचन, निरीक्षण आणि साधेपणातुन होनारी विनोदी निर्मीति यांचे दर्शन घडवते. बऱ्याचदा निबंधची अभंगातील ओळ किंवा एखादी म्हण या पासुन सुरूवात होते. पहीलांदा लिहायला लागल्यावर निबंधाचा विषय सोपा वाटू लागतो आणि पेन हातात घेतला कि काय लिहू आणि कसे लिहू असं वाटायच. थोड तिरक्या नजरेने समोरच्यान काय लिहीले आहे बघायच दोन ओळी दिसल्या की वेळ न घालवतां ते स्वत:च्या वहीत लिहायच.
इंग्रजी निबंध लिहायला सांगितला की आम्ही ते रट्टा मारून पाठ करुन व त्यातूनच विनोदी निर्मिती करायचो. एकदा मराठी पत्र लिहा असे सांगितले पत्राचा विषय होता. ‘तुमच्या मित्राच्या आईचे निधन झाल्यावर मित्राचे सांत्वन करा.’ त्यात एका मैत्रीणीने पत्राची सुरवात रट्टा मारल्या प्रमाणे उजव्या बाजुस पत्ता, खाली प्रिय मित्र राजु यास, वगैरे केली. पुढे मात्र तीच्या पत्राला खरा रंग चढवला. काल तुझे पत्र मिळाल आनंद झाला. मी तुझे पत्र वाचले. वाचून दू:ख झाले. अश्या विषयांशी निगडीत वाक्य लिहून, “ तुझ्या आई-वडीलांना माझा नमस्कार सांग” असे लिहून तिने पत्राचा शेवट केला.
आता ई-मेल काळात पत्रे लिहीण्याचा योग येत नाही. C.I.D. आणि M.B.B.S. या शब्दाते विस्तारीत रूप माहीत आहे पण शि.सा.न.वि.वि. अजुन कोड्यात आहे. आता मुद्दाम प्रयत्न करुनही एवढे साधे निबंध व पत्र लिहीता येनार नाही. चुकून फक्त शाळेची वही सापडली की थोडा वेळ ती वाचून हसायचे एवढेच उरले आहे.
वर्गातला ती पहिली तासिका नेहमीच वर्ग शिक्षकांची असायची. डस्टर आपटल्याचा आवाज आला की शिक्षक वर्गात आलेत असं कळायच. त्या डस्टरच्या आवाजानेच मित्रांशी गप्पा मारणारा बेसावध मुलगा भानावर येउन सर्वात शेवटी उभा राहतो. त्याचे उभे राहणे आणि आणि इतरांचे खाली बसणे एकाच वेळी झाले की वर्गात हास्यकळोळ व्हायचा. हजेरी सुरू व्हायची. काही वेळेस नावं वाचून हजेरी घ्यायचे शिक्षक नाहीतर काहीवेळा हजेरी क्रमांका वरून. शिक्षकांच्या नजरा खाली असल्यावर ‘हजर’ आणि ‘गैरहजर’ बोलायला मजा यायची. काहीवेळा तर दूसऱ्यांची हजेरी द्यायचो आम्ही.
मुलांचे वाचन किती आहे आणि ते वाढावे, त्यांना नविन शब्दांचीच ओळख व्हावी, म्हणू आणि वाकप्रचार स्वत:हून वाक्यात उपयोग करणे अशी काही ‘निबंध’ लिहीण्यामागे कारण असतं. मात्र शाळेच्या मुलाच निबंध वाचले की त्यांचे वाचन, निरीक्षण आणि साधेपणातुन होनारी विनोदी निर्मीति यांचे दर्शन घडवते. बऱ्याचदा निबंधची अभंगातील ओळ किंवा एखादी म्हण या पासुन सुरूवात होते. पहीलांदा लिहायला लागल्यावर निबंधाचा विषय सोपा वाटू लागतो आणि पेन हातात घेतला कि काय लिहू आणि कसे लिहू असं वाटायच. थोड तिरक्या नजरेने समोरच्यान काय लिहीले आहे बघायच दोन ओळी दिसल्या की वेळ न घालवतां ते स्वत:च्या वहीत लिहायच.
इंग्रजी निबंध लिहायला सांगितला की आम्ही ते रट्टा मारून पाठ करुन व त्यातूनच विनोदी निर्मिती करायचो. एकदा मराठी पत्र लिहा असे सांगितले पत्राचा विषय होता. ‘तुमच्या मित्राच्या आईचे निधन झाल्यावर मित्राचे सांत्वन करा.’ त्यात एका मैत्रीणीने पत्राची सुरवात रट्टा मारल्या प्रमाणे उजव्या बाजुस पत्ता, खाली प्रिय मित्र राजु यास, वगैरे केली. पुढे मात्र तीच्या पत्राला खरा रंग चढवला. काल तुझे पत्र मिळाल आनंद झाला. मी तुझे पत्र वाचले. वाचून दू:ख झाले. अश्या विषयांशी निगडीत वाक्य लिहून, “ तुझ्या आई-वडीलांना माझा नमस्कार सांग” असे लिहून तिने पत्राचा शेवट केला.
आता ई-मेल काळात पत्रे लिहीण्याचा योग येत नाही. C.I.D. आणि M.B.B.S. या शब्दाते विस्तारीत रूप माहीत आहे पण शि.सा.न.वि.वि. अजुन कोड्यात आहे. आता मुद्दाम प्रयत्न करुनही एवढे साधे निबंध व पत्र लिहीता येनार नाही. चुकून फक्त शाळेची वही सापडली की थोडा वेळ ती वाचून हसायचे एवढेच उरले आहे.


Well done
ReplyDelete✌️✌️
ReplyDelete❣️
ReplyDeleteKhup chhan...
ReplyDelete