भाऊबीज म्हणजे भावा बहीणीच्या प्रेमळ नात्यांचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक शुध्द द्वितीये दिवशी असतो. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. तर हिंदीत या सणांस भाईदूज असे म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपालमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थणा करते.
भाऊबीजेच्या दिवशी बहीणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. बासुंदी पुरी हा या दिवसाचा खास बेत असतो. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टीळा लावतात. हा टीळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहीणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहीणीचे कौतुक करतो.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पुजा करते. भावाची पुजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तिप्रमाणे पैसे, कपडे, दागिना अशा वस्तु ओवाळणी म्हणून देतो. या दिवशी सख्खा किंवा दुरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पध्दत आहे, म्हणूनच आपण लहाण मुलांना चंद्राला चांदोमामा अशीच हाक मारायला शिकवतो.
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात?
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या माग एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्रे, अलंकार ,वस्तु देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.
यम आणि यमी या भाऊ-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला तेव्हा यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातलं अश्रु काही केल्या थांबवेना. तेव्हा अखेर देवाने दिवस संपला असे भासवण्यासाठी रात्र निर्माण केली. मग यमीला भावाच्या मृत्यू मुळे झालेले दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा आहे. आपल्या भावाला दीर्घायूष्य लाभावे यासाठी बहीणीने यमराजाची पुजा आणि प्रार्थणा करायची असते.
“आई नंतर” जर जगात तुमच्यावर जीव टाकणारच कोणी व्यक्ति असेल तर ती म्हणजे “बहिण”
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आई निर्माण केली. आई फार काळ असु शकत नाही म्हणून त्याने कदाचित आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहते. गुणांच तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरून घालते. बाजू घेउन भांडायला ती सदैव तत्पर असते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने गहीवरलेला असतो.
“बहीण मग ती कोणाचीही असो, तीचा नेहमीच आदर करा…….
हीच खरी भाऊबीज असते………..
भाऊबीजेच्या दिवशी बहीणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. बासुंदी पुरी हा या दिवसाचा खास बेत असतो. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टीळा लावतात. हा टीळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहीणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहीणीचे कौतुक करतो.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पुजा करते. भावाची पुजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तिप्रमाणे पैसे, कपडे, दागिना अशा वस्तु ओवाळणी म्हणून देतो. या दिवशी सख्खा किंवा दुरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पध्दत आहे, म्हणूनच आपण लहाण मुलांना चंद्राला चांदोमामा अशीच हाक मारायला शिकवतो.
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात?
भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या माग एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्रे, अलंकार ,वस्तु देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.
यम आणि यमी या भाऊ-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला तेव्हा यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातलं अश्रु काही केल्या थांबवेना. तेव्हा अखेर देवाने दिवस संपला असे भासवण्यासाठी रात्र निर्माण केली. मग यमीला भावाच्या मृत्यू मुळे झालेले दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा आहे. आपल्या भावाला दीर्घायूष्य लाभावे यासाठी बहीणीने यमराजाची पुजा आणि प्रार्थणा करायची असते.
“आई नंतर” जर जगात तुमच्यावर जीव टाकणारच कोणी व्यक्ति असेल तर ती म्हणजे “बहिण”
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आई निर्माण केली. आई फार काळ असु शकत नाही म्हणून त्याने कदाचित आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहते. गुणांच तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरून घालते. बाजू घेउन भांडायला ती सदैव तत्पर असते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने गहीवरलेला असतो.
“बहीण मग ती कोणाचीही असो, तीचा नेहमीच आदर करा…….
हीच खरी भाऊबीज असते………..


Chimani...
ReplyDelete