Tuesday, April 21, 2020

हे दोन्ही मार्ग परमात्म्याकडे घेऊन जातात


स्रीमनाचे आणि पुरुष मनाचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. चित्त किंवा मानसिक प्रवृत्तीचा देहाशी थेट संबंध नाही. सर्व स्रीया या स्रीमनाच्या असल्या पाहीजेत अशी आवश्यकता नाही. पुरुष ही स्री मनाचे असू शकतात. तसेच स्रीयाही पुरुष मनाच्या असू शकतात. आपल्यात जवळ जवळ अर्धे लोक पुरुष मनाचे आहेत, तर अर्धे स्री मनाचे. पुरुष चित्त म्हणजे मस्तिष्ककेंद्रीत आहेत आणि स्री मनाचे म्हणजे जे ह्रदय केंद्रीत आहेत. दोन्ही प्रकारची मने असलेल्या व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहेच, भावनांचे शुध्दीकरणही महत्त्वाचे आहे. पुरुष मनाच्या भावनाशुध्दीसाठी ध्यानाचे मार्ग अधिक उपयुक्त आहे. असे लोक भावना साधून, अधिकाधिक चैतन्य होऊन, परम जागरूकतेची स्थिती प्राप्त करूनच आपल्या चेतनेची शुध्दी करू शकतील. जे स्री मनाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी प्रेम, भक्ती, श्रध्दा, प्रार्थणा आणि समर्पण भावशुध्दीचा मार्ग आहे. स्री मनासाठी भक्ति मार्ग सोपा आहे. ध्यान म्हणजे चैतन्याची साधना आणि भक्ति म्हणजेच प्रेमाची साधना होय.

दोघांमध्येही एक गोष्ट सारखी आहे शुध्दीकरण. असं यासाठी की आपल्यात अमृतही आहे आणि विषही. उदाहरणासाठी प्रेम. आपल्या ह्रदयातील प्रेमही मिश्रित आहे, कारण यासोबत क्रोध, घृणा, ईर्षा, व्देष, सोम्यतेचा अनुभव आणि अहंकाराचा तत्वेही सामावलेली असतात. यासाठी जसे विषाला अमृतापासून वेगळ करण्यासाठी अमृत मंथन केले होते, त्याचप्रमाने आपल्या भावनेच्या सागरात आपल्या ह्रदयाचे मंथन करून अमृत बाजुला करून विष काढावे

अशाप्रकारे ध्यानाचा मार्ग अवलंबिण्यासाठी आपल्याला बुध्दीची, विचारांची आणि मनाची शुध्दी करावी लागेल. यामधे जो कचरा साचलेला आहे, तो काढावा लागेल, त्याचे साक्षीदार व्हावे लागेल, अधिक चैतन्य आणावे लागेल. यासाठी ध्यानाचे सारे विधी संकल्प करून भावनांचे विरेचन करून मनाची सफाई करून विरेचनापासून याची सुरूवात होते कारण आत काही राहील्यास, ते बाहेर पडावे असे वाटते. मग भेदभाव दूर करून जागरूकतेत एकरूप होणे शक्य आहे.

परमेश्वराच्या मन मंदीरालाप्राप्त करायचे दोनच मार्ग आहेत. साधना जागरूकतेची असू दे किंवा प्रेमाची मार्ग योगाचा असू दे किंवा समर्पणाचा दोघांचे परीमान एकच आहे. दोन्ही मार्ग आपल्या परमात्म्याकडे घेऊन जातात.

जुन्या जमान्यात योग आणि भक्तिचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते. ज्याचे स्रीमन होते, त्याच्यासाठी भक्तीच मार्ग अधिक अनूकुल होता, पण आपल्यात जनसंख्या मोठी आहे जवळ जवळ ५०% ज्यात स्री मन किंवा पुरुष मनाला एखाद्या स्पष्ट श्रेणीत ठेवतां येणार नाही. हे असे लोक आहेत ज्यांच्यात बुध्दी आणि भावनेचे प्रमाण अर्धे अर्धे आहे. जर तुम्हाला ही व्दिधा आहे की, आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे तर दोन्हींचा संयुक्तपणे अवलंब करा

जो ध्यानाचा मार्ग निवडतो, तोच शुध्द चेतनेमध्ये विहार करू शकतो. निर्मळ मनाच्या या अवस्थेत भक्तीची मात्रा शक्य असते. जो चेतनापूर्ण आहे, ज्याचे मन निर्मळ आहे, त्याचीच उर्जा जागृत होऊ शकते. त्याच्यातच अहं भाव निर्माण होतो, तोच संगीताचा आनंद घेऊ शकतो, गाऊ शकतो.

3 comments:

  1. जो चेतनापूर्ण आहे, ज्याचे मन निर्मळ आहे, त्याचीच उर्जा जागृत होऊ शकते. त्याच्यातच अहं भाव निर्माण होतो, तोच संगीताचा आनंद घेऊ शकतो, गाऊ शकतो.

    ReplyDelete