Monday, April 13, 2020

हरवली पाखरे……..!!!


व्हाटसॲप वर आमचे दोन ग्रुप आहेत प्रिनंसेस आणि गल्ली गॅंग. त्या ग्रुप वर कुणाचा वाढदिवस असला तरच जागा होतो, आणि शुभेच्छा देऊन संपल्यावर तो वाळवंटासारखा औसाड होऊन जातो…….

मी तर आश्चर्यचकीत होते की ही तिच लहान पिल्ल आहेत जी मोठी झाली अन त्यांच्यातला एक मित्र मरत गेला.

आमच गावात गावठाण भाग आहे. तिथे आम्ही राहतो. आमची छोटीशी गल्ली. त्यामधे एक खेळण्यासाठी थोडीशी मोकळी जागा होती. कुणाची होती माहीत नाही पण ती जागा आम्ही खेळण्यासाठी वापरायचो. एके दिवशी त्या जागेमध्ये कोणाच्यातरी बांधकामाची वाळू आणुन टाकली. त्यात वाळू असल्याने आमच खेळणं बंद झालं. काही दिवस आम्ही बघितल की वाळू संपेना. वाळू संपायची वाटच नाही बघितली. नंतर आम्ही त्या वाळूमध्येच खेळायचो. विष-अमृत, साखळीचा डाव चांगलाच रंगायचा. त्या मध्ये मुल आणि मुली एकत्र असायची.

साखळी खेळताना कोण कुणालाही पकडायच कुणालाही कुणाचा हात पकडायला लागायचा.

पाप नव्हत आमच्या मनांत. कोण कुणाच्याही शेजारी मांडीला मांडी लावून बसायचं. जगाच्या या घाणेरड्या मलिन नदीपासून खुप दुर होतो आम्ही! नंतर जसं मोठे होत गेलो तसं आजुबाजूस असणाऱ्या लोकांना खटकत गेलो आम्ही मुलं……

मुलांना मिसरूट फुटली, पोरींची चमक वाढली अन् लोकांच्या नजरा बदलायला लागल्या …….

आम्ही एकत्र खेळायचो दिवाळीची सुट्टी म्हणली की खूप धमाल यायची. सुट्टी लागली रे लागली आम्ही २ दिवसात सगळा दिवाळी अभ्यास करून ठेवायचा. ती सुट्टी खुपच कमी असायची. दिवाळी फराळ बनवायला आम्ही तयार असायचो. गल्ली मध्ये सगळ्या बायकांच ठरले असायच, की आज कुणाचं करंजे कायचे आणि उद्या कुणाचे आम्हा मुलांना खास आमंत्रण असायच करंजा करायचे आहेत या तुम्ही. आम्ही पोलपाट लाटन घेऊन तयारीत असणार. एका दिवसात दोन-दोन घरचे करंजा बनवनार. खुप खायला पण भेटायचं… अशी आमची दिवाळीची मज्जा … आता काय व्हाट्ॲप वरच फराळ पाठवतात आणि दिवाळीच्या शुभेच्छा पण!

सुट्टीची मज्जाच वेगळी होती. आम्ही सुट्टीत आबा डबा टीम टीम खेळायचो. त्यात त्या मुलांच काही वेगळच असायच आम्हाला फसवण्याचे त्यांचे वेगळेच उद्योग चालायचे. लपला असलेला मुलगा आम्ही त्यांच्या शर्ट वरून ओळखायचो हे त्यांना चांगलच माहीत होत. म्हणू ते एकमेकांचे शर्ट अदलाबदल करायचे. त्यातच आम्ही फसायचो.

उन्हाळयाच्या सूट्टीत मराठी सिनेमे खुप छान लागतात. आम्ही आमचे खेळ सकाळी खेळुण रिकामे व्हायचो नंतर सिनेमे बघायला पूर्ण दिवस भेटायचा. माझ्या घरी माझे आजोबा होते त्यांना ज्यास्त वेळ टी॰वी॰ बघणं आवडत नव्हत. त्यांच टी॰वी॰ बघून झालं की ते बंद करून जायचे. ते एकदा गेले बाहेर की आम्ही परत टी॰वी॰ लावायचो. त्यांनी एखदा पाहील की सगळी मुल जमुन टी॰वी॰ बघतात, त्या नंतर ते घरातील फ्वूज च काढून ठेवायचे. दुपारच झोपायचं असत असं सांगायचे.

संध्याकाळी आमचा लगोरीचा खेळ चालायचा. लगोरी खेळताना आमचा खुप आरडाओरडा व्हायचा. त्या आमच्या खेळाने संपुर्ण गल्ली त्रासुन गेली होती. एकदा तर एका काकु ने आम्हाला वयतागुन आमच्या लगोरीचे दगडच फेकून दिले.


 हादगा तर मुलींचा सगळ्यात आवडतां खेळ. पाऊस चालु झाला की हस्त नक्षत्रावर हादगा पण चालु होतो. हादग्याला तर रोजच नविन खाऊ डब्यात. हादग्याची गाणी म्हणणार. हात्तीचा फोटो पाटीवर काढुन त्यांच पूजन करनार. नंतर दुसऱ्यान डब्यात काय आणलय ते ओळखायच. नंतर डबा उघडून एक एक खास त्या हत्तीच्या फोटोवर ठेवणार. आपल्या डब्यातल एकमेकांना वाटून खाऊन डबा रीकामा घरी घेउन येनार. हदग्याच्या शेवटच्या दिवशी हात्तीच्या फोटोवर ठेवलेला खाऊ आणि रोजची वाहीलेली फुले नदीवर विसर्जन करनार. असा आमचा खेळ खुप मज्जा यायची.

खुप काही लिहायच होत पण आतापूरते येवढच...

असे माझे बालपण माझ्या आयुष्याच्या नव्या वळणावर विसरून गेलय ……….

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवनी………….

आज एक गाण ऐकल की बालपण डोळ्यांसमोर उभ राहत…….

“ का कळेना अशी हरवली पाखरे………..हरवली हरवली हरवली पाखरे……..!!!

Sunday, April 12, 2020

TV मालीका आणि माझी आई

                                                           
नमस्कार,

मी मालीकंना कंटाळेली एक मुलगी. आजकालच्या मालीकांमधे काहीही दाखवतात…… नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे मुध्यातच हात घालते…… काय आहे ना आजकालच्या मालीका सिनेमा मधे जे काही दाखवतात ते आपल्याला real वाटू लागतात . आता बघा ना आमच्या घरचच घ्या . मी घरी रोज अनुभव घेते. माझी आई तीला मालीका पाहनं येवढ आवडत की आजुबाजुला कोण बसलय हेच कळत नाही. तिला मालीकांचे पात्र खरी वाटू लागतात. तिला वाटते की या मालीकांचे पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेले नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केलं आपल्या ह्रदयाच्या खुप जवळ असतात.

आता हेच उदाहरण पहा ना……..

काही दिवसांपूर्वीच गोष्ट माझ्या लग्नसाठी स्थळ बघत होती. त्यामधे त्यांना मुलगा चांगला, मुलीला शोभेल असा. मुलीच्या वयाच्या मानाने १ ते २ वर्षच मोठा असणारा. पण मालिका मधे चालतोय बापाच्या वयाचा मुलगा! ती मालीका “ तूला पाहते रे “ बघुन आई म्हणते कशी “ कसा मुलीचा वडील आहे तीला लग्नाला परवानगी देतच नाही. “ आता यांवर मी काय बोलनार ना! तिला काय बोलायचे म्हणजे ……

तुम्हाला तर माहीतच आहे …..home minister म्हणल्यावर कोणीच काहीच बोलु शकत नाही..

घरात रोज प्रत्येक मालिकेच चर्चासत्र चालुच असते. त्यात अजुन एक भर पडली ती म्हणजे माझी वहीनी तीला तर मालिकांमधे काहीच रस नव्हता. ती पण आई बरोबर राहुन मालिका बघायची सवय झाली. रोज दोघींच चालू असत आज राधिका गुरूनाथ ला धडा शिकवेल का ……. सुमी सासुबाई ला काय उत्तर देईल. ….. गूरुनाथ काल राधिकाला ओरडला, शनायाच नवीन कारस्थान केलं, राधिकाने ४-५ लिटर आश्रु गाळले…… वगैरे-वगैरे………

बर एवढच नव्हे तर त्या मालिकांचे पुन्हा पुन्हा दिवसभर त्याच त्याच repeat मालिका बघुन त्या पात्राचे संवाद इतके पाठ झालेले असतात कि त्या कलाकाराऐवजी या दोघींना उभ केलं तरी काही बिघडणार नाही……. असो, विषयांतर नको.


म्हणजे माझ सांगण्यात तात्पर्य काय, तर या मालिका खुप जास्त व्यापून टाकतात आपल्या जिवनाला. म्हणजे काय तर, एखादी गोष्ट केली की ती कोणत्याही मालिकेतल्या कोणत्यातरी पकाऊ पात्राप्रमाणे केली आहे अशी comment सहसा ऐकायला मि़ळतेच……..तुझं बोलन-वागन एकदम ‘अंजलीबाई’ सारखं आहे, तू अगदी ‘राणा’ सारखा वागतोस, तु ‘ईशा’ सारखी हसतेस…….अशी ५५० उदाहरण आहेत पण तेवढा वेळ माझ्याकडे आहे ना वाचकांकडे. आमच्या घरामधे या सासु-सुनाकडे खुप वेळ असतो…….असो यांना मालीका बघुन त्यांना सुख भेटत. तुम्ही वाचनातुन घ्या.

महत्वाच असं की ह्या मालीका ज्या सामान्य माणसाच्या देखील इतक्या जवळच्या बनून जातात त्या तितक्याच चांगल्या असायला पाहिजेत असं मला वाटत. सगळ्याच मालिका वाईट असतात असं नाही काही ईतिहासावर मालिका आहेत. एका मालिकेच नाव मला आवर्जुन घ्यावसं वाटत ती म्हणजे डाॅ. अमोल कोल्हें यांची मालिका “ स्वराज्य रक्षक संभाजी “ सत्याचा विजय दाखवण हे मालिकांचे ध्येय असायला हवे, असं माझ ठाम मत आहे……
..
तुम्हाला काय वाटत??????

मालिकांमधे जे दाखवत आहेत ते पाहुन जगात काही चांगले उरले आहे असे अजिबात वाटत नाही. एका मालिकेत सासू सुनेवर जे अत्याचार करते शनाया राधिकाच्या घराचे वासे मोजते,[ तशीच तीची आई पण], राधिकाला घराबाहेर काढणाचा विचार करणारा गुरूनाथ स्वत: शनायाशी जे वागतोय ते सर्व पाहुन जगातल्या चांगुलपणावरचा विश्वास उडत चालला आहे. थोड्या फार फरकाने बऱ्याच मालिका याचेच किस्से गिरवत आहे. सध्या ती माया राधिकाविषयी कटकारस्तान शिजवन्यात मग्न असावी.

असे किस्से रोजच्या पेपरात येतच असतात.

Saturday, April 11, 2020

देवाची आजी


माणूस जन्माला येतो. त्यानंतर त्यांच आयुष्य त्याच्या एका ध्येयापर्यंत जात आणि थांबत. शक्यतो शिक्षण, नोकरी, गाडी, बंगला, लग्न, मुले आणि नंतर मुलांची ह्याच प्रतिक्रियेत शेवटच्या श्वासापर्यंत साथ! पण या प्रतिक्रियेशिवाय स्री किंवा पुरुष पूर्ण होऊ शकत नाही अशी भारतीयांची धारना किंवा. अगदीच संस्कृती याशिवाय सुद्धा जगणारी एक बाई पाहिली मी जगासाठी एक वेगळाच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करून गेली.

मी एका खेडेगावात राहते. छोटंस टुमदार गाव आहे. बंगले, रस्ते, गाड्या आल्या पण विचारसरणी बदलली नाही. मी इतकी वर्ष या प्रतिक्रीयेचा हिस्सा आहे. पण बदलला तो बाह्यरंग आतून माणसं तिच भांडण म्हटल की अगदी जीवावर उठणारी आणि जीव लावला तर जीवाला जीव देणारी!

माझ्या गल्लीच्या मागच्या बाजुला एका मोकळ्या जागेत एक फांद्यानी साकारलेली झोपडी असली तरीही टापटीपणे ठेवलेली. ती झोपडी एका आजीची होती. तिला सगळं गाव देवाची आजी म्हणुन ओळखायची. देवाधर्माच्या गोष्टी अजुनही आमच्या गावाकडे एकत्रित होतात पण त्यांच नेतृत्व देवाची आजी करायची.

नदीवर गौराई आणायला जाताना सगळ्यात पुढे असणारी देवाची आजी. तिच्या मागे चालणाऱ्या वैतागलेल्या डोक्यावरच्या घागरीतली गौराई सांभाळताना आम्ही सगळ्या पोरी!

आजीची गौराईची गाणी तिच्या मागून गुणगुणताना अडखळनारे शब्द आणि ते सुधरवण्याचे प्रयत्न करणारी ती आमची आजी. खुप छान चित्र असायच ते. आजही आम्ही मैत्रीणी एकत्रित जमलो की आजीची आठवण काढतो.

आजीच देवाशी लग्न लागलेल होतं. त्यामुळे तिला देवाची काकू किंवा देवाची आजी म्हणलं जात. आजी हळू हळू म्हातारी होत गेली पण तरीही ती तिच एकटीच काम काटेकोरपणे करायची. नंतर मात्र तिच्याकडून तेही होणे बंद झालं

बऱ्याच दिवसांनंतर आम्हाला कळाल की आजीला तिचा भाचा घेऊन गेला आहे. भाच्याकडून ती परत आल्याचे कळाले. तिच्या भाच्याने घराबाहेर काढले होते. तिला सांभाळतो म्हणुन त्याने तिची गावात असलेली झोपडी विकली आणि पैसे घेऊन गेला. त्याने तिला सांभाळ तर नाहीच उलट तिचे पैसे घेउन तिलाच घराबाहेर काढले. ती गावामध्ये आल्यावर भटकत होती दारोदारी अन्न मागून खात होती. जिथ मोकळ छत दिसेल तिथे ती झोपत होती. तीला गावच्या सरपंचाने एका मंदीरात जागा दिली राहायला. गावकरी तीची मदत करत होते. तीला काय पाहीजे काय नको ते पाहत होते.

ज्या बाईंने आयुष्यभर जगभर आनंद वाटला, तिला मुठभर पोटासाठी दारोदारी भटकाव लागल. नंतर गाव सोडून गेली ती. कुठे गेली ती काय करते कोणीच सांगु शकत नव्हत. फार महीन्यानी खबर आली की देवाची आजी देवाकडे गेल्याच कळाल.

ज्या देवाच्या नावाने मळवट आयुष्यभर तिने भरला, तो तिच्यासाठी फक्त देवच राहिला पती कधीच झाला नाही. ज्या पतीच्या सेवेसाठी तिनं सगळ्यांना एकत्रित केलं त्यांच फळ तिला सोडुन सगळ्यांना मिळाल…………

आजही गौराई आम्ही घराबाहेर नळावर भरून आत घेतो ना तेव्हा एक सेकंद का होईना आम्हाला आजीची आठवणीत डोळ्यात टचकन पाणि येते.

आणि कानात आजीचा गाण्याचा आवाज घुमतो - - - - - - - - - - - - -

आली आली गौराई…………………..