Wednesday, April 22, 2020

हेच आहेत खरे साधू


  
माणूस साधना आणि ज्ञान विध्येच्या चर्चेव्दारे आपापसातील ताळमेळ साधून आपली वृत्ती वाढवू शकतो. कधी कधी असही होत की, माणूस माणसावर बाहेरून एखाद्या वृत्तीवर दबाव टाकण्यात येतो आणि सांगितलं जात की हे गृहीत धरून मार्गक्रमण करा. या मार्गावर चालत असताना असं लक्षात येत की, एक अशी कल्पना समोर येते त्यामुळे पुढे जाण कठीण होऊन बसत. ती कल्पना सांगते की अमूक एका धर्मशास्त्रात ही गोष्ट सांगितली आहे. हे सर्व काही मनुष्याने तयार केलेला प्रपंच आहे. हे संपूर्ण विश्व, पूर्ण ब्रह्मांड माझे आहे, तरीही समुद्रापलीकडे कसा जाऊ, धर्मशास्त्रात यांत निर्बंध आहेत. अशा प्रपंचापासून दूर राहायला हव.

आपल्यासाठी आपले प्राण जितके प्रिय आहेत, इतरांसाठी त्यांचे प्राणही तेवढेच प्रिय आहेत. ही गोष्ट ध्यानात घेतां दुसऱ्यांप्रती दया दाखवतो, त्यांनाच साधू म्हणून संबोधले जाते. हाच बोध मनांत ठेवून त्याने विचारणा केल्यास त्याला माहिती होईल की, भोजनासाठी तो नाहक पशुंची हत्या करतो आहे. मनात हा प्रश्न येतो की, मी असं काम का करू? तसं पाहता सागातही तेच आहे. मांसातही तेच आहे तरीही मन म्हणत की, शास्त्रात लिहील आहे करू नका मग काय करू ? मानाव तर लागेलच. मनांत येत की, असं करण योग्य नाही. तरीही शास्त्राच्या विरोधात काहीही करू शकत नाही. कारण त्यात धाडस नाही. ही एक भावधारा आहे. ही मनाच्या गतीला रोखते. यालाच भाव जडत्व असे म्हणतात. तो चुकीच्या दर्शनाने आले किंवा शास्त्राने ही आले, पण अवश्य त्याचा त्याग करायला हवा.

जर कोणी युक्तीपूर्ण वार्ता करत असेल तर त्याला मानून मार्गक्रमण केल्यास प्रगती होते. ती ह्रदय ज्या ठिकाणी युक्ती काम करत नाही. तेव्हा मानवतेच्या आधारे विचार करावा. माझ्यासाठी प्राण जेवढे प्रिय आहेत, एका पशुसाठी त्याचेही प्राणतेवढेच प्रिय आहेत. मी त्याच्या प्रती दया का दाखवू आणि जर कोणी म्हटलं की, यामुळे पशुंला त्याचा पशु जीवनातून मुक्ती मिळेल, तर तुम्हीही मनुष्य आहेत आणि मनुष्य ही जिव आहे. तर तुम्ही तुमचा गळा कापुन मनुष्य जीवनातून मुक्ती का नाही मिळवत ? तुम्हीही मुलगा-मुली, आप्त, स्वकीयांना मानवी जीवनातून मुक्त करू शकता ? हे मुक्त करायचे आंदोलन आणि वज्राघात नाहक बकरीवरच का? युक्ती तर आपल्याला हेच सांगते.

एका बाजुला भावना आहे आणि दुसऱ्या बाजुला मानवी विशाल ह्रदय आहे, मानवतां आहे. दोघांमधे छोटासा फरक आहे. हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. साधना हा फरक समजून घेण्या लायक बनवते. हे समजून घेतल्यास त्या निर्गुण सत्तेशी एकरूप होऊन एकाकार होण कठिण नाही. अश्या स्थितीत मनुष्य आपल्या मानस विषयाचा त्याग करतो. तो जीवनमान किंवा अनुमान पर्यंत पोहोचतो. तो वर्तमान आपल्या ध्येयात परावर्तित होतो, त्याला जर भूमाचैतन्य किंवा परमपुरूषात परावर्तित कराल तर तुम्हाला निर्विकल्प समाधीचा लाभ होईल निर्गुण स्थिती मिळेल.

2 comments: