Tuesday, April 14, 2020

कन्यादान

कन्यादान म्हणलं की आई बाबांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस. असाच एक अविस्मरणीय कन्यादानाची गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर आली. तुम्हाला वाटत असेल माझ्या लग्नाचा दिवस असेल, हा तो दिवस तर कधीच विसणार नाही मी. पण! असा एक दिवस होता तो माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस ठरला.

आज किशौरीच लग्न होत….. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते…… पूर्ण घर फुलांनी सजवले होते……

किशोरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती….. नाजुक सुंदर…. खुप खुश होती ती….. तीच ते चेहऱ्यावरच मोहक हास्य तीच सौंदर्य आणखी खुलवत होते……. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता…… काही दिवसांपूर्वीच अभि तीला पाहायला आला होता….. आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता….. खुप सुंदर जोडी होती त्यांची……

पण थोड्याच अंतरावर सयाजीराव उभे होते…. किशोरीचे बाबा….. खुप कौतुकाने मुलीकडे पाहत होते….. किशोरीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भुतकाळात हरवले……. किशोरीचा चेहरा तिच्या आई सारखाच होता…… साधी सरळ होती तिची आई…… मोठ्या थाटात लग्न झालं होत त्यांचं…...एक वर्षांचा सुखी संसार झाला असेल त्यांचा…… मग चाहुल लागली येनाऱ्या बाळाची……. खुप जपायचे सयाजीराव त्यांना…….. पण …… पण प्रसूतीचा वेळी अघटित घडले……. आणि एका मुलीला जन्म देऊन……. तिने निरोप दिला या जगाला…...कायमचा…..

सयाजीराव कोलमडले होते…….पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहीलं…… तिचे डोळे आईला शोधत होते……. त्यांनी तिला उचलून घेतले……. अगदी कुशीत….. खुप रडले…… पण शेवटच……. त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आल होत….. त्यांचे डोळे भरून आले होते…… भरल्या डोळ्यानी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते……..

कीशोरीने तिच्या बाबांकडे पाहिलं…...त्याचे भरलेले डोळे बघुन तिच पण मन भरून आल…..तिला आठवले जुने दिवस…...तिचे बाबा हेच तिच जग होत…… जसं कळतय तसं तिचे बाबा तिची आई बनले होते….. आईची आठवण तिला कधीच आली नव्हती……. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठी दुसर लग्न केलं नव्हत…..तिची किती काळजी करायचे तिचे बाबा….नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दु्र्लक्ष केलं नाही…….

आजारी पडली कि रात्र रात्र न झोपतां तिच्या बाजुला बसुन रहायचे….. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडुन परत जाताना चार वेळा वळुन पाहायचे….

किशोरीला पण बाबांन बद्दल खुप जिव्हाळा होता…… आपल्या नंतर त्यांची कोण काळजी घेणार….?? किशोरीच मन अस्वस्थ झालं…...आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग…..

किशोरी झोपली होती…. अचानक तिला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला...ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली…. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते…..तडफड करत होते….तिला काय करावे सुचेना……

“बाबा... बाबा... काय होतय….???” तिने पळत जाऊन पाणी आणल…. पण ती परत येई पर्यंत ते शांत झाले होते….. हातातील पाण्याचा पेला अलगद खाली गळुन पडला….आणि ती तिच्या बाबांना हाक मारु लागली…..रडू लागली…...आणि अचानक सयाजीरावांचे श्वास पुन्हा चालु झाले…… आणि उठूनच बसले…..किशोरी त्यांना बघून रडू लागली….ह्रदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता…...कसे बसे वाचले होते ते……. किशोरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे….

त्यादिवसापासुन तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले…..विवाह संस्था मध्ये चकरा मारू लागले…… मध्येच वकिला कडे पण जायचे…. जेवनाचे भान नाही की आराम नाही……. सतत फक्त तिच्याच लग्नाचा विषय….त्या चिंतेमुळे कि काय त्यांची तबियत पूर्ण ढासाळली होती….. डोळे आत गेले होते…….चेहरा निस्तेज दिसत होता….. अशातच एक दिवस अभि च स्थळ आल….. देखणा मुलगा… चांगली नोकरी…..घरंदाज घरान सर्वकाही एकदमच व्यवस्थित……..

त्यांच्याकडुन लगेच होकार मिळाला….. किशोरीने पण लाजून होकार दिला…… तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती…… सर्वकाही एकदमच गडबडीत…… किशोरी काय बोलली तर ते बोलायचे…. “ मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे…….”

आता कन्यादानाची वेळ आली होती….. भरल्या डोळ्याने आणि जड अंतकरणाने त्यांनी कन्यादान केलं…… जाताना खूप रडले दोघे…...किशोरीचे तर पाय निघतच नव्हते बाबांना सोडुन जाताना….. पण जगाची रीतच होती….. किशोरी गेली…… पाहुणे पण गेले…..तिचे बाबा खुप वेळ एकाच जागी बसलेले होते……. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले…….

दुसऱ्या दिवशी किशोरला वाईट बातमी मिळाली…. तिचे बाबा हे जग सोडुन गेल्याची….. ति आणि अभि लगेच निघाले…… लोक जमले होते….. किशोरी खुप रडत होती…. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर…….अंतविधि पार पडला….. किशोरी अजुनही रडतच होती…. तेवढ्यात तिच लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेल…… ज्यावर पेपर वेट म्हणुन तिची बाहुली ठेवली होती……. तिने ति चिठ्ठी उचलली……. खाली घर आणि जमीनीचे कागदपत्र होते….जे त्यांनी दोन आठवड्या आधीच तिच्या नावावर केलं होत…...ती चिठ्ठी वाचू लागली….

माझी छकुली………

“तु आधी डोळे पुस…..तुला माहीतच आहे की मी तुला रडताना बघु शकत नाही…. एक ना एक दिवस हे होणारच होत…… नको रडूस…… मी खरच खुप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे….. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आल….. खुप समजुदार निघालीस तू……. कधीच आईचा हट्ट केला नाहीस….. तरी पण माझ्याकडून काही कमी राहीली असेल तर माफ कर पोरी…. तुला आठवत असेल त्या दिवशी मला ह्रदय विकाराचा झटका आला होता….. खर तर तेंव्हाच मी हे जग सोडल होत….. माझ्या समोर अंधार पसरला…..माझ्या समोर रेड्यावर बसलेला काळाकुट्ट धिप्पाड व्यक्ति होता. त्याच्या हातात मृत्यू पाश होता….. जो माझ्या भोवती आवळला जात होता…. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्यासाठी हे शरीर मागून घेतले … माझ्या विनंती ने नाही पाहून तुझी आर्त साद ऐकुन त्यांनी मला एवढा वेळ दिला…. मागचा महिना जो तुझ्याबरोबर होता तो फक्त आत्मा होता… ज्यांच शरीर उधारीवर शिल्लक होत… पण माझ काम झालं आता….. वकिला कडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हव होत ते मिळाले. मी कन्यादानाच पुन्य मिळवलं. यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस आनंदाने आयुष्य जग… सर्वांना आनंदी आणि सुखी ठेव माझा आशिर्वाद सतत तुझ्या सोबत राहील… सुखी रहा पोरी…..”

तुझाच बाबा………..

किशोरीचे अश्रु थांबतच नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यू कडून पण वेळ काढून थांबलेले होते..ते पण तिच्या कन्यादानासाठी …. एका मुलीचा बापच हे करू शकतो……. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला….. मागे अभि होता…. त्याने तिचे अश्रु पुसले आणि बोलला ……..” मी तुझ्या डोळ्यात अश्रु नाही पाहु शकत….” किशोरी बिलगली…… पिता नंतर आता पतीच तिच सर्वस्व होता…………...

6 comments: