अर्थात, हा काही प्रेमळ सल्ला नसतो. विविध कारणांनी “देश्याशी गदारी” करणाऱ्या लोकांना शिक्षा म्हणून पाकिस्तानात पाठवायला पाहीजे असा स्वयंघोशीत देशभक्त न्यायाधीशांचा हा ॲानलाईन दम असतो. असो आपल्या हिंदू धर्मात दोन ग्रंथाना प्रचंड महत्व दिल आहे. ते म्हणजे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’. रामायण म्हणजे ‘आदर्शवाद’ आणि महाभारत म्हणजे ‘वास्तववाद’.
पण तात्पुरत तरी या दोन्ही ग्रंथांबाबतच्या आख्यायिका किंवा त्यात सांगितलेले चमत्कार यांकडे आपण दुर्लक्ष करायचं जरी ठरवल तरी यांची पाळं मुळ किती खोलवर गेली आहेत याचा आपल्याला अंदाज सुध्दा यायचा नाही! पण, खरच वाटत की रामायणावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी एकदा श्रीलंकात जाऊन यांवच. रामायनातील चमत्कार बाजुला ठेऊया क्षणभर. परंतु, रामायण घडले नाही,असं ठामपणे म्हणणाऱ्याना लोकांनी रामायणातील विविध प्रसंगांचे श्रीलंकेत सापडणारे पुरावे आवर्जून बघायला हवेत.
रामायणामधील लंका म्हणजे आजची श्रीलंका. भारत आणि श्रीलंकामधील भल्यामोठ्या समुद्राच अंतर भगवान रामाने सेतू बांधून पार केल्याच आपण ऐकत आलो आहोत. त्यानंतर प्रभूंनी श्रीलंकेत जाऊन रावणाशी युध्द केले आणि विजय मिळवला. रावणाची लंका म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर असे देखील म्हटले जाते. रामायणामधे लंकेचा अर्थात आजच्या श्रीलंकेचा थेट उल्लेख असल्यामुळे आपल्याला या देशाबद्दल खूप अप्रूप ही वाटत. अर्थात सध्याची श्रीलंका सोन्याची नाही. पण तिथे आपल्याला रामायनामधील बरीचशी ठिकाणी आणि काही गोष्टी आजही अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात.
श्रीलंकामध्ये मंदोदरी महाल पाहायला मिळतो. या महालाच्या चारी बाजुला धबधबे आणि घनदाट जंगल आहे. रावणाने माता सितेच हरण केल्यानंतर तिला याचं मंदोदरी महलामधे ठेवले होते. याला स्थानिक भाषेत ‘सीता कोटूवा’ अर्थात सीतेचा किल्ला असे म्हटले जाते.
पुष्पक विमान स्थळ ——
पुष्पक विमान स्थळ ——
याचं सिंहाला शहरामध्ये वेरागनटोटा नावाचे ठिकाण आहे. याचा अर्थ आहे ‘विमान उतरण्याचे ठिकाण’ असे म्हणतात की हीच जागा आहे जेथे रावण त्याचे पुष्पक विमान उतरवायचा.
अशोक वाटीका ——
अशोक वाटीका ——
रावणाने येथेच माता सीतेला कैद करून ठेवले होते. बाजूलाच पाण्याचा ओढा देखील आहे. म्हणतात की माता सीता याचं ओढ्यामध्ये स्नान करायची. या ओढ्याच्या आसपासच्या दगडांवर भले मोठे पायांचे निशान आढळून येतात. हे निशान हनुमानाचे असल्याचे सांगितले जाते. या ओढ्याच्या काठावर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे मंदीर आहे.
सीता तलाव ——
सीता तलाव ——
श्रीलंकामध्ये आजही तो दूरवर जाणारा रस्ता पाहायला मिळतो ज्यावरून रावणाने माता सीतेच हरण करून लंकेत प्रवेश केला. त्या रस्त्यावर झाड या एकही लहानस रोपट ही नाही. याचं मार्गावर हा सीता तलाव आहे. असे म्हणतात की माता सीतेच्या अश्रुंनी या तलावाची निर्मिती झाली. दुष्काळ पडलाकी आसपासच्या नद्या कोरड्या पडतात पण हा तलाव मात्र कधीही आटत नाही. हे विशेष! या सीता तलावाच्या आजूबाजूला सीता फुल आढळतात. या फुलांची खासीयत ही आहे की या फूलांना अगदी जवळून पाहील्यास कोणीतरी व्यक्ती हातात धनुष्य घेऊन उभा असल्याचा भास होतो. स्थानिकांच्या मते माता सीता या फुलांच्या माध्यमातून प्रभू रामाचे दर्शन घ्यायची. हे फुल पृथ्वीतलावर केवळ याचं जागेत आढळते.
जेथे रावणाने सीता मातेला लपवून ठेवले होते: ———
श्रीलंकेमधे रावणगोडा नावाचे ठिकाण आहे. म्हणतात की जेव्हा हनूमानाने आपल्या शेपटीने संपुर्ण लंका उध्वस्त केली तेव्हा याचं जागी रावणाने माता सीतेला लपवून ठेवले होते. या जागी अनेक गुहा आणि भुयारे आहेत. ही भुयारे थेट रावणाच्या शहराला जोडतात. मुख्य म्हणजे ही भुयारे नैसर्गिक नसून तयार करण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी हनुमानाने रावणाचे विमान जाळले होते तेथे आजही जळल्याचे डाग आहेत आणि तेथील माती करड्या रंगाची आहे.
श्रीलंकेच्या अनेक पर्वतावर आजही संजीवनी वनस्पती आढळते.
श्रीलंकेच्या अनेक पर्वतावर आजही संजीवनी वनस्पती आढळते.
ही सगळी फार मोजकीच उदाहरणं आहेत. तुम्हाला श्रीलंकामध्ये अशी इतर अनेक ठिकाणे आढळतील ज्यांचा उल्लेख रामायणामध्ये आहे, किंवा रामायनातील विविध घटनांचा संदर्भ आहे.
म्हणूनच म्हटल ना, - रामायणावर विश्वास नसनाऱ्यांना एकदा श्रीलंकेत पाठवायला हवे!
म्हणूनच म्हटल ना, - रामायणावर विश्वास नसनाऱ्यांना एकदा श्रीलंकेत पाठवायला हवे!










👌👍🚩🚩🚩🚩
ReplyDelete