Monday, April 27, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहिर्जी नाईक

छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. ज्यांना कश्याचीही भीती नव्हती, जोवर आपला राजा बरोबर आहे तोवर आपण मोठी मजल मारू शकतो हे जणू त्यांनी मनावर बींबवून घेतलच होतं

या भावनेतून त्यांनी रचलेल्या शूर पराक्रमाच्या गाथांमधुन उभं राहील हिंदवी स्वराज्य!

हिंदवी स्वराज्याच्या अश्या मावळ्याला मागोवा घेताना इतिहास आपल्यासमोर अश्या एका अज्ञात शिलेदाराचे नाव उलघडतो ज्याच्या बद्दल सध्याच्या युगातील शिव आणि स्वराज्यप्रेमींना देखील फारशी माहिती नसावी.अर्थात त्यांच नाव बरेच जण ऐकून असतील पण त्यांचे कर्तुत्व मात्र अजुनही इतिहासाच्या पानांमध्येच कैद असल्याचे आढळते. 

शिवाजी महाराजांच्या या थोर मावळ्यांचा जिवनप्रवास आणि स्वराज्यनिर्मितीमधील त्याचे योगदान या संक्षिप्त लेखाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न!

हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहूरूपी आणि गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’ होय.


बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा ‘गुप्त’ आधारस्तंभ म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्यशिवाय शत्रुप्रदेशामध्ये मोहीमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.

कारण शत्रु गोटातील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्ताची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थाने आणि युध्द प्रसंगी रामबान इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम गुप्तहेर खाते करत असे.

 म्हणजे एक प्रकारची विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यांवर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांच्या शूर शिलेदारांचे असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करीत असत.

महाराज्याच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल ३-४ हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरक्या होते बहिर्जी नाईक. त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामध्ये प्रसिध्द असलेल्या सर्वच मोहीमा यशस्वी करून दाखवल्या.

तर अश्या या नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नाईक म्हणजे कणा होते.

महाराजांनी जेव्हा रायरेश्र्वरच्या मंदीरामध्ये स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःला वाहून घेण्याची शपथ घेतली तेव्हापासून महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याची सेवा केली. बहिर्जी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरूप्याची कला अवगत होती.
विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे. पुढे पोटापाण्यासाठी त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहूरूपाची त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहूरूप्याची कला दाखवण्यास सूरवात केली.

तेव्हाच एका क्षणी महाराजांची आणि बहिर्जींची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेत महाराजांनी हा व्यक्ती खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रुच्या गोट्यात राहून त्यांना खेळण्यासाठी जन्माला आली आहे.

हे ताडकन ओळखले आणि बहिर्जींना आपल्या सेनेत सामील करून घेतले. वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा बहिर्जी कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करीत. एखाद्या व्यक्तीनं त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनीटांत दुसऱ्या वेश्यात पाहिले तर त्याला ते किंचीतही ओळखतां आले नाही इतका जबरदस्त वेश ते पलटायचे.

To be continues next blog……….

 Reference by    google.com,  times of Maharashtra, news paper 
      

No comments:

Post a Comment