आपण लहान असताना आपल्याला घरातील मोठी माणसे गोष्टी सांगायची. मला ही माझ्या आजी ने गोष्टी सांगीतलेय. माझ्या घरी माझे आजी आजोबा माळकरी असल्यामुळे आमच्या घरात विठ्ठल रूक्मिणी आणि राधा कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या जायच्या. अशीच एक कृष्णाची गोष्ट माझ्या आजीने सांगितली होती तीच मी गोष्ट मांडत आहे.
एकदा कृष्णा आपल्या दोन्ही बायकांशी गप्पा मारत बसले होते.

गप्पांमध्ये सत्यभामाने विचारले की,......
“नाथ मी आपल्याला किती आवडते?”
त्यांवर कृष्ण म्हणाले,....
“हे सत्यभामे साखरे प्रमाणे आवडतेस.” लगेच रूक्मिणीने हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, “रूक्मिणी तू मला मिठासारखी आवडतेस.”
हे ऐकून सत्यभामा खुप खुष झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रूक्मिणि रूसुन बसली की मी मिठाप्रमाणे. रागात रूक्मिणी तिथून निघून गेली. आपल्या प्रिय रूक्मिणीला रागावलेले बघून दुसऱ्या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मिठ न घालण्याची सूचना दिली आणि जेवनात गोड धोड पदार्थही करायला सांगीतले.
स्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाने जेवले. परंतु जेव्हा रूक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत.
आधिच रागात असलेली रूक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली,.......
“स्वयंपाक फार आळणी झालाय.”भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला,”आज मीठ संपले होते, म्हणून जेवन आळणी बनवाव लागले.
अर्धपोट जेवून उठली रूक्मिणी आणि महालात फेऱ्या मारू लागली.
तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले,..........
“की जेवन एवढ्या लवकर कसे झाले? आज गोडाधोडाचा स्वाद घेतला नाही वाटत.”
त्यांवर रूक्मिणी रागाने म्हणाली,........
“गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदीच अळणी होते. मिठाशीवाय स्वयंपाकाला जरातरी चव होती का?”
यांवर कृष्ण म्हणाले,.....

गप्पांमध्ये सत्यभामाने विचारले की,......
“नाथ मी आपल्याला किती आवडते?”
त्यांवर कृष्ण म्हणाले,....
“हे सत्यभामे साखरे प्रमाणे आवडतेस.” लगेच रूक्मिणीने हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, “रूक्मिणी तू मला मिठासारखी आवडतेस.”
हे ऐकून सत्यभामा खुप खुष झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रूक्मिणि रूसुन बसली की मी मिठाप्रमाणे. रागात रूक्मिणी तिथून निघून गेली. आपल्या प्रिय रूक्मिणीला रागावलेले बघून दुसऱ्या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मिठ न घालण्याची सूचना दिली आणि जेवनात गोड धोड पदार्थही करायला सांगीतले.
स्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाने जेवले. परंतु जेव्हा रूक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत.
आधिच रागात असलेली रूक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली,.......
“स्वयंपाक फार आळणी झालाय.”भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला,”आज मीठ संपले होते, म्हणून जेवन आळणी बनवाव लागले.
अर्धपोट जेवून उठली रूक्मिणी आणि महालात फेऱ्या मारू लागली.
तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले,..........
“की जेवन एवढ्या लवकर कसे झाले? आज गोडाधोडाचा स्वाद घेतला नाही वाटत.”
त्यांवर रूक्मिणी रागाने म्हणाली,........
“गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदीच अळणी होते. मिठाशीवाय स्वयंपाकाला जरातरी चव होती का?”
यांवर कृष्ण म्हणाले,.....
“मीठ नसल्याने स्वयंपाकाच्या चव नाही, हे तूच म्हणतेस आहे बघ. मग मी तुला मीठासारखी आवडतेस म्हंटल्यावर तू रागावली.”

मिठाशीवाय स्वयंपाकाला सार नाही......
ReplyDeleteSuperb
ReplyDelete...