Wednesday, April 29, 2020

भारत आणि चीन


सध्याच्या काळात चीन मध्ये काही वेगळीच परिस्थिती आहे. चीन मध्येच नव्हे तर पुर्ण जगात कोरोना ने थैमान घातलाय. चीन मध्ये आताची बेताचा झाली आहे. त्यांनी केलेला करोनाचा सामना या सगळ्याबद्दल बोलले जात आहे.चीन ने हॅास्पिटल उभे केले ते ही फक्त ७ दिवसात आपल्या देश्यातील लोकं लवकर बरे व्हावे म्हणून. कित्येक रूग्णांचे जीव वाचवले.

ह्या बातम्या माहिती असतीलच, पण साधारण १९४० मध्ये भारतातल्या आणि खास म्हणजे महाराष्ट्रातल्या एका डाॅक्टरने चीनला जाऊन तिथल्या रूग्णांना बर केलं, त्यांची सेवा केली. हे कदाचित कोणाला माहीत नसावे.

चीनमधला कोणताही बडा नेतां भारतात आला की तो एका कुटूंबाशी हमखास भेटतो. मुंबईच्या कोटणीस कुटूंबाची. काही जणांची ज्यांच नाव ऐकल असेल अश्या डाॅ. व्दारकानाथ कोटणीस .

कोण होते डाॅ. कोटनीस, ज्यांना चीन मध्ये इतका मान दिला जातो.

दुसऱ्या महायुध्दावेळी चीन आणि जपान एकमेकांविरूध्द लढले होते. त्याचवेळी एका भारतीय डाॅक्टरांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चीनी सेनिकांचे प्राण वाचवले होते.

डाॅ. व्दारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांच नाव. जपान आणि चीनमधलं युध्द पेटल्यानंतर चीन चे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगच लागण झाली होती. त्या वेळी आपल्या इथे इंग्रज सरकार होत. चीन ने इंग्रज सरकारांकडून मदत मागितली होती. त्याचवेळी कोटणीसकरांना नुकतीच डाॅक्टर ची पदवी मिळाली होती. ते त्यांच्या गावी सोलापूरला जावून दवाखाना उभारणार होते. त्याचवेळी त्यांना इंग्रज सरकारच पत्र मिळाले की, चीन मध्ये तुम्हाला जाव लागणार आहे. ते घरच्यांची परवांगी घेण्यासाठी ते गावी गेले. घरच्यांनी चीन ला जाण्यास परवांगी दिली.

भारतीय वैद्यक मिशनंन एक टीम चीन ला पाठवली. त्या टीममध्ये डाॅ. कोटनीस हे एक होते. ते आपल काम अतिशय मन लावून करत असत. त्यांनी केलेल्या सेवेमुळे अनेक चीनी सैनिकांचे प्राण वाचले. युध्द भूमीवर प्लेगच भीषन लागन झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डाॅक्टर घाबरत असत.पण कोटनीस कधी घाबरले नाहीत. त्यांनी कीमान ८०० जणांवर उपचार केले असावेत. अस म्हणतात तिथल्या परीस्थितीमुळे त्यांच्या सोबत भारतातून आलेले डाॅक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्या समर्पण भावामुळेच त्याचा चीन मध्ये आदर केला जातो. वयाच्या यवघ्या ३२ व्या वर्षी १९४६ साली डाॅ. कोटनीस यांच अल्पशा आजारान निधन झालं.

“सैन्यानं एका चांगला सहकारी आणि देशान एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवन सदैव आपल्या मनांत  ठेवूया.” असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटनीसांना आदरांजली वाहताना काढले होते.

      
चीन मध्ये असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्किंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात पडले. २०१२ मध्ये त्यांच डालीयन या शहरात निधन झालं. त्यांना एक मुलगा होता. पण तो वैद्दकिय शिक्षण घेत असताना वयाच्या २४ वर्षीच त्याचा मृत्यु झाला.

डाॅ. कोटणीस यांच मुळ गाव सोलापूर. त्यांनी मुंबईच्या सेठ जी.एस. मेडिकल काॅलेजमध्ये वैद्दकीय शिक्षण घेतलं.

भारतात मात्र त्यांची फारशी आठवण कुणी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डाॅ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता.

चीनमध्ये आजही आदरणीय
चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट छापले आहे. हंबे या भागांत त्यांच स्मारक उभारण्यात आल आहे. या शतकातील चीनचे सर्वात जवळचे परदेशी मित्र अस सर्व्हेक्षन २००९ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आल होत. या यादीमध्ये डाॅ. कोटनीस यांचही नाव होतं. डाॅक्टरांचा आजही चीनमध्ये खुप आदर केला जातो अस चायना डेली या वृत्तपत्रात म्हटल आहे.

डाॅ. कोटनीस यांच्या लोकप्रियतेच कारण काय? १९५० सालापासुन आजपर्यंत त्यांच्या कुटूंबियांना चीनचे नेते का भेट देतात?

“१९६२ साली भारत आणि चीन चे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरूध्द आणि वसाहतवादाविरूध्द लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे.” अस चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांच म्हणणं आहे.
“भारत आणि चीन एकाच वेळी वसाहतवाद आणि साम्राज्यवादी लढत होते. कोटनीस कुटूंबीयांचि भेट धेऊन चीनी नेते दोन्ही देशांत असलेल्या एकतेच्या भावनेची पुन्हा आठवन करून देतात.” असही कोंडापल्ली म्हणतात.

१९४० साली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या सात वर्ष आधी आणि चीनच्या क्रांतीनंतर सात वर्षांनी माओ यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहीले आणि सांगितलं, “चीनी आणि भारतीय लोकांचा उध्दार म्हणजे सर्व शोषितांचा उध्दार करणे आहे.

१९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी चॅंग काय शेक यांना एक पत्र लिहीले, पत्रात ते लिहीतात, “तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्वतंत्र्य युध्दाबद्दल कायमच आस्था होती. हा संदर्भ आणि आपल्या संवादामुळे मला चीन च्या समस्या आणखी चांगल्या समजल्या.”

प्रा. कोंडापल्ली सांगतात, ते जेव्हा डाॅ कोटनीस यांना आदरांजली वाहतात तेव्हा भारत आणि चीनच्या सौहार्दापुर्व संबंधाची आठवन येते.

त्यानंतर आता जग फार बदललं आहे

चीन आणि जपान या जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारताचे दोघांशीही आर्थिक संबंध आहेत. भुतकाळातील काही बाबी आणि सीमाप्रश्नामुळे जपान आणि चीन यांचे संबंध कायम तानलेले असतात. भारत आणि चीन यांच्यातही सिमावाद आहे.

तरीही डाॅ. कोटणीस यांची आठवण आहेच.

No comments:

Post a Comment