Thursday, April 30, 2020

भितीदायक सत्य घटना


भयानक घटना म्हणटले की आपल्याला भिती वाटायला लागते. पण काही घटना सत्य ही असतात,आणि काही काल्पनिक ही असतात. जे आपण TV मलिका आणि सिनेमांमधून बघतो ते सर्व काल्पनिक असते. आपल्या अजुबाजूला भितीदायक घटना घडत असतात त्या ऐकुन आपल्याला विश्वास होवू लागतो, की भूतं, जादूटोणा वगैरे आहे. आज आपण आश्याच दोन सत्य घडलेल्या घटना पाहणार आहोत.

१. डीसुजा चाळ
                   
डीसुजा चाळ ही मुंबईच्या माहीम येथे आहे. ही चाळ खुप मोठी असुन त्या चाळींमध्ये एक विहीर आहे. अस सांगतात की २० वर्षा पुर्वी या विहीरीला कोणतीही कडा नव्हती. एकदा चाळीत राहनारी एक महिला पाणी घेण्यासाठी त्या विहीरीकडे गेली असताना, त्या विहीरीला कडा नसल्याने तीचा पाय घसरून ती विहीरीत पडली. ती स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत होती. तीची हाक कोणालाही ऐकु आली नाही. ती त्या विहीरी मध्ये बुडून मरन पावली. या घटनेला २० वर्ष झाली तरीही त्या विहीरी कडे जाण्यास लोक घाबरतात. त्या विहीरी भोवती तिची आत्मा फिरत असते असे तिथे राहणारी लोक सांगतात.
तिथे त्या विहीरीचा मालक दर आमावश्याला पुजा करतात. बऱ्याच लोकांनी एका महीलेची आकृती पाहिली ती नंतर अदृश्य होते. त्या आत्माने तिथे राहणाऱ्या लोकांना हाणी पोहचवली नाही. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. पण लोकांना बहुतेकदा सल्ला दिला जातो, की एकट्याने तिथे जाऊ नका. या चाळीत आणखी एक आत्मा आहे ती म्हणजे एका रक्षकाची असुन बहुतेकदा एका झाडाच्या जवळपास दिसते. तो रात्री येत असल्याचे दिसुन येत आहे. आणि काही लोक त्याला चाळीचे रक्षण करताना बघतात.

२. टाॅवर ॲाफ सायलेन्स

टाॅवर ॲाफ सायलेन्स हे नाव ऐकण्याईतकेच भीतीदायक आणि शांत आहे. दिवस रात्र इथे शांतता असते. आणि ही शांतता प्राणघातक आहे. याला शांततेचे क्षेत्र मानले जाते. हा जगातील सर्वात भयानक भाग मानला जातो. हे अश्या प्रकारचे एकमेव क्षेत्र आहे जेथे भितीदायक प्रवास केवळ पृथ्वीच्या अनुभवापुरते मर्यादित नाही तर त्या पेक्षा बरच काही आहे. दिवसा आपल्याला येथे एकापेक्षा जास्त भितीदायक दृश्य पाहायला मिळेल. इथली दृश्य भीतीदायक तसेच भिन्न आहेत.

इथल्या दृश्यांमध्ये लपलेल्या भीतीचे एक मोठे कारण आहे. आणि त्याचे कारण धार्मिक विधी आहे, ज्यामुळे येथे येणे म्हणजे वाईट गोष्टी स्वतःवर ओढावून घेतल्यासारखे होते. मुंबईच्या मलबार हिल भागांत स्थित टाॅवर ॲाफ सायलेन्स प्रत्यक्षात पारशी स्मशानभूमी आहे. इथल्या पारशी समाजातील लोक त्यांच्या मेलेल्यांचे अंतिम संस्कार करतात. त्यांच्या मध्ये मेलेल्या मानसाला जाळले किंवा पुरले जात नाही. ते मेलेल्या मानसाचे शरीर तिथे स्मशानभुमित सोडुन येतात. प्राण्याना खाण्यासाठी. गिधाडे आणि गरूड ते शरीर खाउन टाकतात.
विकृत शरीर, मानवी सांगाडे, शरीरातून देहाचे मांस पाहून आपले रक्त गोठेल. दिवसात ज्या ठिकाणी असे घडते, त्या ठिकाणी रात्री काय देखावे असतील. येथील स्थानिकांमध्ये प्रचंड भिती आहे. इथे जरी एखाद्याने दिवसा जाण्याची चूक केली तर रात्रीच्या वेळी कोणीही इथे जाण्याची हिम्मत करत नाही.

येथे एक मुलगी पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसते. जे रात्रीच्या वेळी त्या रस्त्यातून येनाऱ्या जाणाऱ्यांना लिफ्ट मागत असते. या व्यतिरिक्त या ठिकाणी कार अपघातात ठार झालेल्या पारशी कुटूंबातील व्यक्तीनी त्या मुलीला पाहिले असल्याचा दावाही केला जात आहे.

तिथे बऱ्याचदा लोक येताना आणि जाताना दिसतात. ते गाडी खराब झाल्याच्या बहाण्याने लोक त्यांच्यकडे खेचतात आणि मदतीसाठी आवाहन करतात. या आत्म्यांनी इथून जाणाऱ्या काही लोकांचे नुकसान केले, त्यानंतर येथे अस सांगण्यात येते की तेथे जाणे धोक्याच ठरू शकत. आणि आजारपणाचे आव्हान आहे.

हे ऐकण्यासारखे किती आहे, आणि खरे किती आहे. काही लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण अज्ञान लोक घाबरतात

Wednesday, April 29, 2020

भारत आणि चीन


सध्याच्या काळात चीन मध्ये काही वेगळीच परिस्थिती आहे. चीन मध्येच नव्हे तर पुर्ण जगात कोरोना ने थैमान घातलाय. चीन मध्ये आताची बेताचा झाली आहे. त्यांनी केलेला करोनाचा सामना या सगळ्याबद्दल बोलले जात आहे.चीन ने हॅास्पिटल उभे केले ते ही फक्त ७ दिवसात आपल्या देश्यातील लोकं लवकर बरे व्हावे म्हणून. कित्येक रूग्णांचे जीव वाचवले.

ह्या बातम्या माहिती असतीलच, पण साधारण १९४० मध्ये भारतातल्या आणि खास म्हणजे महाराष्ट्रातल्या एका डाॅक्टरने चीनला जाऊन तिथल्या रूग्णांना बर केलं, त्यांची सेवा केली. हे कदाचित कोणाला माहीत नसावे.

चीनमधला कोणताही बडा नेतां भारतात आला की तो एका कुटूंबाशी हमखास भेटतो. मुंबईच्या कोटणीस कुटूंबाची. काही जणांची ज्यांच नाव ऐकल असेल अश्या डाॅ. व्दारकानाथ कोटणीस .

कोण होते डाॅ. कोटनीस, ज्यांना चीन मध्ये इतका मान दिला जातो.

दुसऱ्या महायुध्दावेळी चीन आणि जपान एकमेकांविरूध्द लढले होते. त्याचवेळी एका भारतीय डाॅक्टरांनी आपले प्राण धोक्यात घालून अनेक चीनी सेनिकांचे प्राण वाचवले होते.

डाॅ. व्दारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांच नाव. जपान आणि चीनमधलं युध्द पेटल्यानंतर चीन चे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अनेकांना प्लेगच लागण झाली होती. त्या वेळी आपल्या इथे इंग्रज सरकार होत. चीन ने इंग्रज सरकारांकडून मदत मागितली होती. त्याचवेळी कोटणीसकरांना नुकतीच डाॅक्टर ची पदवी मिळाली होती. ते त्यांच्या गावी सोलापूरला जावून दवाखाना उभारणार होते. त्याचवेळी त्यांना इंग्रज सरकारच पत्र मिळाले की, चीन मध्ये तुम्हाला जाव लागणार आहे. ते घरच्यांची परवांगी घेण्यासाठी ते गावी गेले. घरच्यांनी चीन ला जाण्यास परवांगी दिली.

भारतीय वैद्यक मिशनंन एक टीम चीन ला पाठवली. त्या टीममध्ये डाॅ. कोटनीस हे एक होते. ते आपल काम अतिशय मन लावून करत असत. त्यांनी केलेल्या सेवेमुळे अनेक चीनी सैनिकांचे प्राण वाचले. युध्द भूमीवर प्लेगच भीषन लागन झाली होती. सैनिकांवर उपचार करण्यास इतर डाॅक्टर घाबरत असत.पण कोटनीस कधी घाबरले नाहीत. त्यांनी कीमान ८०० जणांवर उपचार केले असावेत. अस म्हणतात तिथल्या परीस्थितीमुळे त्यांच्या सोबत भारतातून आलेले डाॅक्टर घरी परतले, पण कोटणीस त्या ठिकाणीच थांबले. त्यांच्यात असलेल्या समर्पण भावामुळेच त्याचा चीन मध्ये आदर केला जातो. वयाच्या यवघ्या ३२ व्या वर्षी १९४६ साली डाॅ. कोटनीस यांच अल्पशा आजारान निधन झालं.

“सैन्यानं एका चांगला सहकारी आणि देशान एक चांगला मित्र गमावला आहे. त्यांची आठवन सदैव आपल्या मनांत  ठेवूया.” असे उद्गार चीनचे तत्कालीन सर्वोच्च नेते माओ झेदांग यांनी कोटनीसांना आदरांजली वाहताना काढले होते.

      
चीन मध्ये असताना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या व्किंगलन नावाच्या एका नर्सच्या प्रेमात पडले. २०१२ मध्ये त्यांच डालीयन या शहरात निधन झालं. त्यांना एक मुलगा होता. पण तो वैद्दकिय शिक्षण घेत असताना वयाच्या २४ वर्षीच त्याचा मृत्यु झाला.

डाॅ. कोटणीस यांच मुळ गाव सोलापूर. त्यांनी मुंबईच्या सेठ जी.एस. मेडिकल काॅलेजमध्ये वैद्दकीय शिक्षण घेतलं.

भारतात मात्र त्यांची फारशी आठवण कुणी काढताना दिसत नाही. फक्त काही पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख असतो. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या जीवनावर डाॅ. कोटणीस की अमर कहानी हा चित्रपट काढला होता.

चीनमध्ये आजही आदरणीय
चीनमध्ये ते आजही अत्यंत आदरणीय आहेत. चीननं त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट छापले आहे. हंबे या भागांत त्यांच स्मारक उभारण्यात आल आहे. या शतकातील चीनचे सर्वात जवळचे परदेशी मित्र अस सर्व्हेक्षन २००९ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून करण्यात आल होत. या यादीमध्ये डाॅ. कोटनीस यांचही नाव होतं. डाॅक्टरांचा आजही चीनमध्ये खुप आदर केला जातो अस चायना डेली या वृत्तपत्रात म्हटल आहे.

डाॅ. कोटनीस यांच्या लोकप्रियतेच कारण काय? १९५० सालापासुन आजपर्यंत त्यांच्या कुटूंबियांना चीनचे नेते का भेट देतात?

“१९६२ साली भारत आणि चीन चे संबंध बिघडले. पण कधीकाळी दोन्ही देशांनी परदेशी राजवटीविरूध्द आणि वसाहतवादाविरूध्द लढा दिला आहे. या भेटीमागे हा देखील समान धागा आहे.” अस चीनविषयक धोरणांचे अभ्यासक श्रीकांत कोंडापल्ली यांच म्हणणं आहे.
“भारत आणि चीन एकाच वेळी वसाहतवाद आणि साम्राज्यवादी लढत होते. कोटनीस कुटूंबीयांचि भेट धेऊन चीनी नेते दोन्ही देशांत असलेल्या एकतेच्या भावनेची पुन्हा आठवन करून देतात.” असही कोंडापल्ली म्हणतात.

१९४० साली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या सात वर्ष आधी आणि चीनच्या क्रांतीनंतर सात वर्षांनी माओ यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहीले आणि सांगितलं, “चीनी आणि भारतीय लोकांचा उध्दार म्हणजे सर्व शोषितांचा उध्दार करणे आहे.

१९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी चॅंग काय शेक यांना एक पत्र लिहीले, पत्रात ते लिहीतात, “तुमच्याबद्दल आणि तुमच्या स्वतंत्र्य युध्दाबद्दल कायमच आस्था होती. हा संदर्भ आणि आपल्या संवादामुळे मला चीन च्या समस्या आणखी चांगल्या समजल्या.”

प्रा. कोंडापल्ली सांगतात, ते जेव्हा डाॅ कोटनीस यांना आदरांजली वाहतात तेव्हा भारत आणि चीनच्या सौहार्दापुर्व संबंधाची आठवन येते.

त्यानंतर आता जग फार बदललं आहे

चीन आणि जपान या जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. भारताचे दोघांशीही आर्थिक संबंध आहेत. भुतकाळातील काही बाबी आणि सीमाप्रश्नामुळे जपान आणि चीन यांचे संबंध कायम तानलेले असतात. भारत आणि चीन यांच्यातही सिमावाद आहे.

तरीही डाॅ. कोटणीस यांची आठवण आहेच.

Tuesday, April 28, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहीर्जी नाईक

बहिर्जींकडे फक्त वेषांतरचीच कला होती असे नाही तर समोरच्याचा आपल्या शब्दांनी वेध घेऊन त्यांच्या नकळत सर्व माहिती काढून घेण्याचे कसब त्यांना पुरते अवगत होती.

अहो चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापुरचा आदिलशाह यांच्या महालात ते वेषांतर करून फिरत असत.
  जराशीही शंका आली तरी समोरच्याला शत्रु पक्षाचा माणूस ठरवून देहदंड देणाऱ्या भेदक नजर कधीही बहिर्जींचा ठाव घेऊ शकली नाहीत यातच बहिर्जींचे असामान्य कर्तुत्व सामावलेले होते. शिवाजी महाराजांनी गुप्तहेर खात्याची सर्व सूत्रे बहिर्जींकडे दिली असल्याने बहिर्जी देखील अतिशय प्रमाणीकपणाने ते खाते चालवत असत. त्या खात्यावर त्यांचा पूर्ण वचक होता.  

    खोटी माहिती देणाऱ्या आपल्या खात्यातील सहकाऱ्यासह कडेलोट दिला जाईल अशी सक्त ताकीत बहिर्जींना दिली होती. त्यामुळे महाराजांचे गुप्तहेरखाते कार्यक्षमपणे कार्यरत असायचे. 
  बहिर्जीनी गुप्तहेर खात्याची एक सांकेतिक भाषा विकसित केली होती. ही भाषा केवळ गुप्तहेर खात्यालाच कळे. त्यामुळे गुप्तहेर खात्याची माहिती बाहेर फुटली जात नसे. अगदी महत्त्वपूर्ण माहिती द्दायची असल्यास बहिर्जी स्वतःहून महाराजांच्या दरबारात हजर व्हायचे. तेव्हा देखील ते वेषांतर करून येत असल्याने इतरांच्या नजरेस पडायचे नाहीत.
असे म्हटले जाते की बहिर्जी नाईक असा कोणी माणूस नाहीच, असे काही लोकांना वाटत असे. इतके बेमालूमपणे आणि अज्ञातवास असल्यासारखे ते वापरायचे. 
अनेकांना असे वाटत असेल की बहीर्जी नाईक हे फक्त गुप्तहेराचेच काम करायचे त्यात काय कर्तुत्व? तर अश्यांना सांगावेसे वाटते की,ते लढण्यात देखील तरबेज होते. पण तरीही गुप्तहेराचे काम म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे
शत्रुच्या गोटात असताना कधी कोणाला संशय येईल आणि कधी कोण नंग्या तलवारीशी अंगावर धावून येईल याचा नेम नसायचा. त्यमुळे बहिर्जी दांडपट्टा, तलवारबाज यांसारखी युध्द तंत्रे आत्मसात करून घेतली होती. त्यांच जोरावर ते अटीतटीच्या प्रसंगांमधून एकट्याने शत्रुला धूळ चाखवत बाहेर पडायचे.

 अफझल खानाचा वध ही स्वराज्याच्या इतिहासातील मोठी घटना. त्यात बहीर्जींनी फार मोठी कामगीरीच बजावली होती

शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना इतिहासामध्ये दिली गेलेली उपाधी सर्वच दृष्टीने सार्थ ठरते 
महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालूक्यामध्ये बाणूरगड नावाचा किल्ला आहे. कधी भेट दिली तर तुम्हाला या गुप्तहेराची समाधी आढळून येईल. तेव्हा न चुकतां या समाधीसमोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करण्यास विसरू नका.

                                            Reference by, google.com,  times of Maharashtra, news paper 


Monday, April 27, 2020

छत्रपतींचा तिसरा डोळा “बहिर्जी नाईक”

बहिर्जी नाईक

छत्रपती शिवाजी महाराजांच स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. ज्यांना कश्याचीही भीती नव्हती, जोवर आपला राजा बरोबर आहे तोवर आपण मोठी मजल मारू शकतो हे जणू त्यांनी मनावर बींबवून घेतलच होतं

या भावनेतून त्यांनी रचलेल्या शूर पराक्रमाच्या गाथांमधुन उभं राहील हिंदवी स्वराज्य!

हिंदवी स्वराज्याच्या अश्या मावळ्याला मागोवा घेताना इतिहास आपल्यासमोर अश्या एका अज्ञात शिलेदाराचे नाव उलघडतो ज्याच्या बद्दल सध्याच्या युगातील शिव आणि स्वराज्यप्रेमींना देखील फारशी माहिती नसावी.अर्थात त्यांच नाव बरेच जण ऐकून असतील पण त्यांचे कर्तुत्व मात्र अजुनही इतिहासाच्या पानांमध्येच कैद असल्याचे आढळते. 

शिवाजी महाराजांच्या या थोर मावळ्यांचा जिवनप्रवास आणि स्वराज्यनिर्मितीमधील त्याचे योगदान या संक्षिप्त लेखाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न!

हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहूरूपी आणि गुप्तहेर ‘बहिर्जी नाईक’ होय.


बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा ‘गुप्त’ आधारस्तंभ म्हणावे लागतील. स्वराज्य सेनेच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते सांभाळत असतं. या गुप्तहेर खात्याच्या साहाय्यशिवाय शत्रुप्रदेशामध्ये मोहीमा आखणे जवळ जवळ अशक्य होते.

कारण शत्रु गोटातील हालचाली, तेथील प्रदेशांमधील महत्ताची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींची कमकुवत स्थाने आणि युध्द प्रसंगी रामबान इलाज ठरेल अशी एखादी गुप्त गोष्ट शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम गुप्तहेर खाते करत असे.

 म्हणजे एक प्रकारची विजयाचा पाया घालण्याचे काम हे गुप्तहेर खाते करायचे आणि पुढे त्यांवर कळस चढवण्याचे काम अर्थातच महाराजांच्या शूर शिलेदारांचे असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील गुप्तहेर खात्याचे महत्त्व माहित असल्याने अगणित निधी ते या खात्यावर खर्च करीत असत.

महाराज्याच्या गुप्तहेर खात्यामध्ये तब्बल ३-४ हजार गुप्तहेरांचा भरणा होता आणि त्यांचे म्होरक्या होते बहिर्जी नाईक. त्यांच्याच माध्यमातून महाराजांनी आज इतिहासामध्ये प्रसिध्द असलेल्या सर्वच मोहीमा यशस्वी करून दाखवल्या.

तर अश्या या नेहमी पडद्याआड असणाऱ्या महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नाईक म्हणजे कणा होते.

महाराजांनी जेव्हा रायरेश्र्वरच्या मंदीरामध्ये स्वराज्य निर्मितीसाठी स्वतःला वाहून घेण्याची शपथ घेतली तेव्हापासून महाराजांच्या शेवटच्या श्वासापर्यंत बहिर्जी नाईक यांनी स्वराज्याची सेवा केली. बहिर्जी नाईक यांना लहानपणापासूनच बहुरूप्याची कला अवगत होती.
विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे. पुढे पोटापाण्यासाठी त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहूरूपाची त्यांनी एक व्यवसाय म्हणून बहूरूप्याची कला दाखवण्यास सूरवात केली.

तेव्हाच एका क्षणी महाराजांची आणि बहिर्जींची नजरानजर झाली आणि पहिल्याच नजरेत महाराजांनी हा व्यक्ती खेळ करण्यासाठी नव्हे तर शत्रुच्या गोट्यात राहून त्यांना खेळण्यासाठी जन्माला आली आहे.

हे ताडकन ओळखले आणि बहिर्जींना आपल्या सेनेत सामील करून घेतले. वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत कोणताही वेष म्हणा बहिर्जी कोणाचीही अगदी उत्तम नक्कल करीत. एखाद्या व्यक्तीनं त्यांना एका वेशात पाहिले आणि नंतर अगदी काही मिनीटांत दुसऱ्या वेश्यात पाहिले तर त्याला ते किंचीतही ओळखतां आले नाही इतका जबरदस्त वेश ते पलटायचे.

To be continues next blog……….

 Reference by    google.com,  times of Maharashtra, news paper 
      

Sunday, April 26, 2020

शापित बाहुली एक सत्य घटना



शापित बाहूली ओकलट म्युझियम पोहोचणे

त्या घरीच त्या शापित बाहूलीपासून सुटका करण्यासाठी वाॅरेन दाम्पत्य फादर कुकबरोबर मिळून एक अभिमंत्रित क्रिया करतात आणि बाहुलीला आपल्याबरोबर घेऊन जातात. गाडीतून जाताना त्यांच्या लक्षात येते की, गाडीचे पाॅवर ब्रेक और स्टेरिंग काम करत नाहीत. ते बाहूलीवर पवित्र जल टाकतात, त्यामुळे ती शांत होते वाॅरेन दाम्पत्य सुखरूप घरी पोहोचतात. एक दोन दिवसात बाहुली परत पहिल्यासारखी करू लागते.
घराबाहेर जाताना हे दाम्पत्य त्या बाहूलीला ज्या ठिकाणी ठेवत असत, घरी आल्यावर ती बाहुली त्या जागेवर नसून भलत्याच ठिकाणी त्यांना मिळत असे. त्यांच दरम्यान एक घटना घडते.

 एकदा फादर जॅसन वाॅरेनला त्याच्या ॲाफिसमध्ये येतात आणि त्या बाहुलीला उचलून बोलतात की, ही तर फक्त एक बाहूली आहे आणि ही कोणाला नुकसान करू शकत नाही.

घरी जाताना त्यांचा मोठा अपघात होतो आणि ते जखमी होतात. त्यानंतर वाॅरेन त्या बाहूलीला एका अभिमंत्रित बाॅक्समध्ये टाकतात आणि आपल्या म्युझियममध्ये ठेवतात. त्या बाॅक्समधे ठेवल्यानंतर बाहुली कोणतीही हालचाल करायची नाही. पण त्यानंतर सुध्दा वाॅरेन त्या बाहुलीला अजुन एकाच्या मृत्यूचे कारण मानतात.

 एकदा एक तरूण आणि त्याची प्रेमिका वाॅरेन यांचे म्युझियम पाहण्यासाठी आले. ज्यावेळी वाॅरेन त्यांना या बाहुलीच गोष्ट सांगितली तेव्हा त्या तरूणाने या बाहुलीची खूप मस्करी केली


तो तरून बोलला की, जर ही बाहुली एखाद्या माणसाच्या शरीरात घाव करू शकते तर मी नक्कीच ते अनुभवू इच्छितो. वाॅरेनने त्या दोघांना तिथून बाहेर जाण्यास सांगितले. म्युझियम बाहेर गेल्यानंतर काही वेळातच त्या दोघांचा अपघात होतो, त्यामध्ये त्या तरूणाचा मृत्यु होतो आणि ती मुलगी गंभीर जखमी होते.

वाॅरेनचे म्हणणे होते की,

“तुम्ही कधीही राक्षसी ताकदीला आव्हान करू नका, कारण त्या शक्ती माणसापेक्षा खूप शक्तिशाली असतात.”

एड और लाॅरेन वाॅरेन

एडवर्ड वाॅरेन आणि लाॅरेन रीटा वाॅरेन अमेरिका पॅरानाॅर्मल एक्टिविटीज इन्वेस्टिगेटर्स होते. एडवर्ड दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी अमेरिका नौसेनेचे अधिकारी होते. त्यांची पत्नी लाॅरेन रीटा वाॅरेन पॅरानाॅर्मल एक्सपर्ट होती.
या दाम्पत्यांनी ‘द वाॅरेंस ॲाकल्ट’ नावाचे म्युझियम उघडले होते आणि त्यांनी आतापर्यंत जवळपास १०,००० भूतांची प्रकरणे सोडवली होती. एडवर्ड वाॅरेनचा २००६ मध्ये मृत्यू झाला.

आजही ती बाहुली त्या म्युझियम मध्ये पाहायला मिळते.

Saturday, April 25, 2020

शापित बाहुली एक सत्य घटना

        

एनाबेल हा हाॅलिवूड चा चित्रपट आहे. या चित्रपटाने आणि त्याचाच दुसरा भाग असलेल्या एनाबेल क्रिएशन या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलेच घाबरवले.

या चित्रपटामध्ये दाखवलेली बाहुली खुप विचित्र आणि भीतीदायक आहे. एनीबेल हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. 

या चित्रपटामधे जसे लोकांना बाहुली त्रास देते, तसेच खऱ्या आयुष्यामध्ये देखील झाले आहे. चित्रपट फक्त बघूनच ते एवढे भयानक वाटते, मग विचार करा की, खऱ्या आयुष्यामध्ये ज्यांनी अनुभवलेल असेल त्यांच्यावर काय परीस्थिती ओढवली असेल.

गोष्टींची सुरूवात :——

१९७० मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणारी डोना जी तिची मैत्रीण अनंगीबरोबर एका अपार्टमेंट मध्ये राहत होती. त्यांच्याबरोबर लू नावाचा मुलगा सुध्दा राहत असे.

डोनाच्या आई ने तिच्या वाढदिवसाला तिला एन्टिक बाहुली गिफ्ट केली होती. पण तिच्या आई ला आणि तिला हे माहीत नव्हत की, काही दीवसामध्ये ती बाहुली त्यांचे जगणे कठीण करून ठेवेल.

डोना आपल्या आईने दिलेली बाहुली आपल्या बेडवर एका कोपऱ्यात सजवून ठेवत असे.
 काही दिवसांमध्ये डोनाला आणि तिच्या मैत्रीणीला त्या बाहूलीचा वाईट अनुभव येऊ लागला. त्याच्या लक्षात आले की, बाहुली स्वतःहून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाते. त्या दोघी ज्या ठिकाणी बाहूलीला ठेवून जात असत, घरी आल्यावर बाहुली त्या जागेवर नसायची. ती बाहुली दूसऱ्याच ठिकाणावर असे. बाहूलीला एखाद्या रूम मध्ये जर दरवाजा बंद करून जरी त्या दोघी बाहेर गेलेल्या असल्या तरी सुध्दा तरी ती बाहुली आपली जागा सोडून बाहेर जात असे.

हळू हळू रूम मध्ये काही चिट्या मिळू लागल्या. त्याच्यावर ‘हेल्प मी’ असं लिहीलेल असायच. ते अक्षर एखाद्या लहान मुलाच असावे. त्यानंतर त्यांनी एक आत्माशी संवाद साधणाऱ्या एका व्यक्तींला बोलावले. त्या व्यक्तीने सांगितलेकी, या बाहूलीमध्ये लहान मुलीची आत्मा आहे. तिचे नाव एनाबेल होते. ती मुलगी इथेच खेळायची आणि तिचा मृत्यू देखील येथेच झाला आहे. तिला डोना आवडते तिला तिच्याबरोबर राहायच आहे. डोनाने तिला ठेवण्यास होकार दिला.

थोडे दिवस गेल्यानंतर परत डोनाला भयानक अनुभव यायला सूरूवात झाली. तिच्याबरोबर राहणाऱ्या लू ने सांगितले की, या बाहुलीमध्ये राक्षसी ताकत आहे आणि तिला जवळ ठेवने खूप भारी पडू शकते.

 एकदा लू वर त्या बाहूलीने हल्ला केला. हे त्याने डोना आणि अनंगीला सांगितले पण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हळूहळू डोनाला लक्षात आले की, त्या बाहूलीमध्ये लहान मुलीचा आत्मा नाही. ऐके दिवशी दुपारी लू आणि अनंगी घरात गप्पा मारत असताना त्यांना डोनाच्या रूममधून किंचाळण्याचा आवाज आला, परंतु डोना तर घरात नव्हती. त्या दोघांनी घाबरतच तिच्या रूममध्ये प्रवेश केला, पण तिथे ती बाहूली सोडून कोणीच नव्हत. बाहूलीने लू वर हल्ला केला आणि त्याला जखमी केले. या घटनेनंतर लू शाॅकमध्ये गेला.

पॅरानाॅर्मल इन्वेस्टीगेशन :——-

लू वर हल्ला झाल्यानंतर डोनाच्या लक्षात येते की, ही मुलगी शापित आहे आणि तिच्यामध्ये राक्षसी आत्मा आहे.

डोना मदत मिळवण्यासाठी एक बिशप “फादर हेगन” कडे जाते. फादर हेगन ला ती बाहूली शापित असल्याचे कळते. म्हणून तो डोनाला आपल्यापेक्षा वरिष्ठ “फादर कुक” कडे पाठवतो.

फादर कुक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पॅरानाॅर्मल एक्सपर्ट वाॅरेन दाम्पत्याला बोलवतात. 

वाॅरेन दाम्पत्य त्या तिन्ही मित्रांचे म्हणणे ऐकतात आणि एक आठवडा त्या बाहूलीच्या व्यवहाराचे निरीक्षण करतात. तेव्हा त्यांना समजते की, त्या बाहुलीला डोनाच्या शरीरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी त्या बाहूलीने एवढा खटाटोप केला होता.

तिला लू आवडत नसे म्हणून तिने त्याच्यावर हल्ला केला होता आणि त्यांनी बोलवलेल्या माणसाला सुध्दा त्या बाहूलीने खोटे सांगितले.

To be continue next blog ……….

Friday, April 24, 2020

श्रीलंकेत रामायण


सोशल मीडीयामध्ये “जा पाकिस्तानात” चा गजर घुमत असतो. वंदेमातरम म्हणायच नाही? जा पाकिस्तानात! राष्टगीताला उभं राहायच नाही? पाठवा पाकिस्तानात!

अर्थात, हा काही प्रेमळ सल्ला नसतो. विविध कारणांनी “देश्याशी गदारी” करणाऱ्या लोकांना शिक्षा म्हणून पाकिस्तानात पाठवायला पाहीजे असा स्वयंघोशीत देशभक्त न्यायाधीशांचा हा ॲानलाईन दम असतो. असो आपल्या हिंदू धर्मात दोन ग्रंथाना प्रचंड महत्व दिल आहे. ते म्हणजे ‘रामायण’ आणि ‘महाभारत’. रामायण म्हणजे ‘आदर्शवाद’ आणि महाभारत म्हणजे ‘वास्तववाद’.
पण तात्पुरत तरी या दोन्ही ग्रंथांबाबतच्या आख्यायिका किंवा त्यात सांगितलेले चमत्कार यांकडे आपण दुर्लक्ष करायचं जरी ठरवल तरी यांची पाळं मुळ किती खोलवर गेली आहेत याचा आपल्याला अंदाज सुध्दा यायचा नाही! पण, खरच वाटत की रामायणावर विश्वास नसणाऱ्या लोकांनी एकदा श्रीलंकात जाऊन यांवच. रामायनातील चमत्कार बाजुला ठेऊया क्षणभर. परंतु, रामायण घडले नाही,असं ठामपणे म्हणणाऱ्याना लोकांनी रामायणातील विविध प्रसंगांचे श्रीलंकेत सापडणारे पुरावे आवर्जून बघायला हवेत.

                                          

रामायणामधील लंका म्हणजे आजची श्रीलंका. भारत आणि श्रीलंकामधील भल्यामोठ्या समुद्राच अंतर भगवान रामाने सेतू बांधून पार केल्याच आपण ऐकत आलो आहोत. त्यानंतर प्रभूंनी श्रीलंकेत जाऊन रावणाशी युध्द केले आणि विजय मिळवला. रावणाची लंका म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर असे देखील म्हटले जाते. रामायणामधे लंकेचा अर्थात आजच्या श्रीलंकेचा थेट उल्लेख असल्यामुळे आपल्याला या देशाबद्दल खूप अप्रूप ही वाटत. अर्थात सध्याची श्रीलंका सोन्याची नाही. पण तिथे आपल्याला रामायनामधील बरीचशी ठिकाणी आणि काही गोष्टी आजही अस्तित्वात असलेली पाहायला मिळतात.
 

अश्या काही ठिकाणांची माहिती घेऊ या.

मंदोदरी महाल
——
श्रीलंकामध्ये मंदोदरी महाल पाहायला मिळतो. या महालाच्या चारी बाजुला धबधबे आणि घनदाट जंगल आहे. रावणाने माता सितेच हरण केल्यानंतर तिला याचं मंदोदरी महलामधे ठेवले होते. याला स्थानिक भाषेत ‘सीता कोटूवा’ अर्थात सीतेचा किल्ला असे म्हटले जाते.

पुष्पक विमान स्थळ ——

याचं सिंहाला शहरामध्ये वेरागनटोटा नावाचे ठिकाण आहे. याचा अर्थ आहे ‘विमान उतरण्याचे ठिकाण’ असे म्हणतात की हीच जागा आहे जेथे रावण त्याचे पुष्पक विमान उतरवायचा.

अशोक वाटीका ——

रावणाने येथेच माता सीतेला कैद करून ठेवले होते. बाजूलाच पाण्याचा ओढा देखील आहे. म्हणतात की माता सीता याचं ओढ्यामध्ये स्नान करायची. या ओढ्याच्या आसपासच्या दगडांवर भले मोठे पायांचे निशान आढळून येतात. हे निशान हनुमानाचे असल्याचे सांगितले जाते. या ओढ्याच्या काठावर राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे मंदीर आहे.

सीता तलाव ——

श्रीलंकामध्ये आजही तो दूरवर जाणारा रस्ता पाहायला मिळतो ज्यावरून रावणाने माता सीतेच हरण करून लंकेत प्रवेश केला. त्या रस्त्यावर झाड या एकही लहानस रोपट ही नाही. याचं मार्गावर हा सीता तलाव आहे. असे म्हणतात की माता सीतेच्या अश्रुंनी या तलावाची निर्मिती झाली. दुष्काळ पडलाकी आसपासच्या नद्या कोरड्या पडतात पण हा तलाव मात्र कधीही आटत नाही. हे विशेष! या सीता तलावाच्या आजूबाजूला सीता फुल आढळतात. या फुलांची खासीयत ही आहे की या फूलांना अगदी जवळून पाहील्यास कोणीतरी व्यक्ती हातात धनुष्य घेऊन उभा असल्याचा भास होतो. स्थानिकांच्या मते माता सीता या फुलांच्या माध्यमातून प्रभू रामाचे दर्शन घ्यायची. हे फुल पृथ्वीतलावर केवळ याचं जागेत आढळते.

जेथे रावणाने सीता मातेला लपवून ठेवले होते: ———
श्रीलंकेमधे रावणगोडा नावाचे ठिकाण आहे. म्हणतात की जेव्हा हनूमानाने आपल्या शेपटीने संपुर्ण लंका उध्वस्त केली तेव्हा याचं जागी रावणाने माता सीतेला लपवून ठेवले होते. या जागी अनेक गुहा आणि भुयारे आहेत. ही भुयारे थेट रावणाच्या शहराला जोडतात. मुख्य म्हणजे ही भुयारे नैसर्गिक नसून तयार करण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी हनुमानाने रावणाचे विमान जाळले होते तेथे आजही जळल्याचे डाग आहेत आणि तेथील माती करड्या रंगाची आहे.

श्रीलंकेच्या अनेक पर्वतावर आजही संजीवनी वनस्पती आढळते.
                 
        
ही सगळी फार मोजकीच उदाहरणं आहेत. तुम्हाला श्रीलंकामध्ये अशी इतर अनेक ठिकाणे आढळतील ज्यांचा उल्लेख रामायणामध्ये आहे, किंवा रामायनातील विविध घटनांचा संदर्भ आहे.

म्हणूनच म्हटल ना, - रामायणावर विश्वास नसनाऱ्यांना एकदा श्रीलंकेत पाठवायला हवे!

Thursday, April 23, 2020

कष्टाचे महत्त्व: राजाची शक्कल;शेतकरी मालामाल


माणूस हा आयुष्यभर कोणत्या ना काणत्या कारणांसाठी विविध प्रकारची कष्ट करत असतो. कष्ट मेहनत आणि परिश्रम या माध्यमातून यश संपादन करत असतो. कष्टाशिवाय सुख मिळू शकत नाही. सुखासाठी, आनंदासाठी, समृध्देसाठी कष्टाला पर्याय नसतो. कष्ट आणि कर्म या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र, अनेकदा कर्म आणि कष्ट यांपासून माणूस दूर पळत असतो. कष्ट करण्याची तयारी नसते. असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी, अशीही अनेकांची वृत्ती असते. कष्ट करणाऱ्यांनाच कष्टांचे महत्त्व पटत असते. शिवाय दुसऱ्याला कष्ट करताना किती त्रास होतो, याचीही जाणीव असते. जीवन सुरळीत जाण्यासाठी कष्ट करणे भागच असते. कष्टांचे महत्त्व समजवण्यासाठी एका राजाने शक्कल लढवली. याचा फायदा मात्र एका गरीब शेतकऱ्याला झाला.
ललित नगरीचा राजा आदित्यदेव यांनी एक दिवस प्रजेची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळी एक मोठा दगड रहदारी अधिक असलेल्या मार्गावर ठेवला. दिवस पुढे सरकला, तशी रस्त्यावर रहदारी वाढली. जो-तो त्या दगडाच्या बाजूने जायला लागला. त्या रस्त्यावर जाणाऱ्या जवळपास प्रतेकाला त्या दगडाचा त्रास होत होता. मात्र कुणीही तो दगड बाजुला करण्याचे कष्ट घेतले नाहीत. राजाचे मंत्री, सैनिक, कामगार सर्वजण त्या रस्त्यावरून गेले. परंतु कोणीही दगड रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला नाही. सूर्य डोक्यावर आल्यावर मात्र सर्वांनी राजाला आणि यंत्रणेला दोष देण्यास सुरूवात केली. राज्य कारभार करण्यास राजा सक्षम नाही. राजाला प्रशासनाचा गाडा चालवायचा अनुभव नाही. एवढेच नव्हे तर, राजाची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का? हा दगड बाजुला का केला जात नाही? असे प्रश्न उपस्थित करू लागले.

संपूर्ण दिवस राजावर दोषारोप करण्यात गेला. मात्र, कुणीही दगड हटवला नाही. सायंकाळ झाली हळूहळू अंधार होऊ लागला. त्या रस्त्यावरून एक वृध्द शेतकरी जात होता. त्याच्या डोक्यावर भाज्यांचा टोपला होता. तो शेतकरी त्या दगडाजवळ पोचला. त्यालाही अडचण आली. आपल्या डोक्यावरील ओझे उतरवून शेतकरी दगड बाजुला करू लागला. दगडामुळे ये जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये, हा उद्देश त्यामागे होता. तो दगड बाजुला करताना त्याला खुप कष्ट होत होते. शेवटी अथक प्रयत्नाने तो दगड त्याने बाजुला केला.

आपला टोपला घेऊन पुढे जाणार, इतक्यात त्या दगडाच्या जागेवर एक पिशवी दिसली. तो पिशवी जवळ गेला आणि पिशवी उचलली. त्या पिशवीत सोन्याची ५०० नाणी होती. पिशवित सोन्याची नाणी पाहून शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. तो आनंदीत झाला. त्या पिशवीत नाण्याशिवाय एक पत्र होते. त्या पत्रात लिहीले होते की, दगड बाजुला करणाऱ्याला व्यक्तिला राजा आदित्यदेव यांच्याकडून विशेष बक्षीस देण्यात येत आहे. कारण जनतेच्या अडचणी, कष्ट दूर करण्याचा आपण प्रयत्न केला.

Wednesday, April 22, 2020

हेच आहेत खरे साधू


  
माणूस साधना आणि ज्ञान विध्येच्या चर्चेव्दारे आपापसातील ताळमेळ साधून आपली वृत्ती वाढवू शकतो. कधी कधी असही होत की, माणूस माणसावर बाहेरून एखाद्या वृत्तीवर दबाव टाकण्यात येतो आणि सांगितलं जात की हे गृहीत धरून मार्गक्रमण करा. या मार्गावर चालत असताना असं लक्षात येत की, एक अशी कल्पना समोर येते त्यामुळे पुढे जाण कठीण होऊन बसत. ती कल्पना सांगते की अमूक एका धर्मशास्त्रात ही गोष्ट सांगितली आहे. हे सर्व काही मनुष्याने तयार केलेला प्रपंच आहे. हे संपूर्ण विश्व, पूर्ण ब्रह्मांड माझे आहे, तरीही समुद्रापलीकडे कसा जाऊ, धर्मशास्त्रात यांत निर्बंध आहेत. अशा प्रपंचापासून दूर राहायला हव.

आपल्यासाठी आपले प्राण जितके प्रिय आहेत, इतरांसाठी त्यांचे प्राणही तेवढेच प्रिय आहेत. ही गोष्ट ध्यानात घेतां दुसऱ्यांप्रती दया दाखवतो, त्यांनाच साधू म्हणून संबोधले जाते. हाच बोध मनांत ठेवून त्याने विचारणा केल्यास त्याला माहिती होईल की, भोजनासाठी तो नाहक पशुंची हत्या करतो आहे. मनात हा प्रश्न येतो की, मी असं काम का करू? तसं पाहता सागातही तेच आहे. मांसातही तेच आहे तरीही मन म्हणत की, शास्त्रात लिहील आहे करू नका मग काय करू ? मानाव तर लागेलच. मनांत येत की, असं करण योग्य नाही. तरीही शास्त्राच्या विरोधात काहीही करू शकत नाही. कारण त्यात धाडस नाही. ही एक भावधारा आहे. ही मनाच्या गतीला रोखते. यालाच भाव जडत्व असे म्हणतात. तो चुकीच्या दर्शनाने आले किंवा शास्त्राने ही आले, पण अवश्य त्याचा त्याग करायला हवा.

जर कोणी युक्तीपूर्ण वार्ता करत असेल तर त्याला मानून मार्गक्रमण केल्यास प्रगती होते. ती ह्रदय ज्या ठिकाणी युक्ती काम करत नाही. तेव्हा मानवतेच्या आधारे विचार करावा. माझ्यासाठी प्राण जेवढे प्रिय आहेत, एका पशुसाठी त्याचेही प्राणतेवढेच प्रिय आहेत. मी त्याच्या प्रती दया का दाखवू आणि जर कोणी म्हटलं की, यामुळे पशुंला त्याचा पशु जीवनातून मुक्ती मिळेल, तर तुम्हीही मनुष्य आहेत आणि मनुष्य ही जिव आहे. तर तुम्ही तुमचा गळा कापुन मनुष्य जीवनातून मुक्ती का नाही मिळवत ? तुम्हीही मुलगा-मुली, आप्त, स्वकीयांना मानवी जीवनातून मुक्त करू शकता ? हे मुक्त करायचे आंदोलन आणि वज्राघात नाहक बकरीवरच का? युक्ती तर आपल्याला हेच सांगते.

एका बाजुला भावना आहे आणि दुसऱ्या बाजुला मानवी विशाल ह्रदय आहे, मानवतां आहे. दोघांमधे छोटासा फरक आहे. हा फरक समजून घेणे गरजेचे आहे. साधना हा फरक समजून घेण्या लायक बनवते. हे समजून घेतल्यास त्या निर्गुण सत्तेशी एकरूप होऊन एकाकार होण कठिण नाही. अश्या स्थितीत मनुष्य आपल्या मानस विषयाचा त्याग करतो. तो जीवनमान किंवा अनुमान पर्यंत पोहोचतो. तो वर्तमान आपल्या ध्येयात परावर्तित होतो, त्याला जर भूमाचैतन्य किंवा परमपुरूषात परावर्तित कराल तर तुम्हाला निर्विकल्प समाधीचा लाभ होईल निर्गुण स्थिती मिळेल.

Tuesday, April 21, 2020

हे दोन्ही मार्ग परमात्म्याकडे घेऊन जातात


स्रीमनाचे आणि पुरुष मनाचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. चित्त किंवा मानसिक प्रवृत्तीचा देहाशी थेट संबंध नाही. सर्व स्रीया या स्रीमनाच्या असल्या पाहीजेत अशी आवश्यकता नाही. पुरुष ही स्री मनाचे असू शकतात. तसेच स्रीयाही पुरुष मनाच्या असू शकतात. आपल्यात जवळ जवळ अर्धे लोक पुरुष मनाचे आहेत, तर अर्धे स्री मनाचे. पुरुष चित्त म्हणजे मस्तिष्ककेंद्रीत आहेत आणि स्री मनाचे म्हणजे जे ह्रदय केंद्रीत आहेत. दोन्ही प्रकारची मने असलेल्या व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहेच, भावनांचे शुध्दीकरणही महत्त्वाचे आहे. पुरुष मनाच्या भावनाशुध्दीसाठी ध्यानाचे मार्ग अधिक उपयुक्त आहे. असे लोक भावना साधून, अधिकाधिक चैतन्य होऊन, परम जागरूकतेची स्थिती प्राप्त करूनच आपल्या चेतनेची शुध्दी करू शकतील. जे स्री मनाचे लोक आहेत, त्यांच्यासाठी प्रेम, भक्ती, श्रध्दा, प्रार्थणा आणि समर्पण भावशुध्दीचा मार्ग आहे. स्री मनासाठी भक्ति मार्ग सोपा आहे. ध्यान म्हणजे चैतन्याची साधना आणि भक्ति म्हणजेच प्रेमाची साधना होय.

दोघांमध्येही एक गोष्ट सारखी आहे शुध्दीकरण. असं यासाठी की आपल्यात अमृतही आहे आणि विषही. उदाहरणासाठी प्रेम. आपल्या ह्रदयातील प्रेमही मिश्रित आहे, कारण यासोबत क्रोध, घृणा, ईर्षा, व्देष, सोम्यतेचा अनुभव आणि अहंकाराचा तत्वेही सामावलेली असतात. यासाठी जसे विषाला अमृतापासून वेगळ करण्यासाठी अमृत मंथन केले होते, त्याचप्रमाने आपल्या भावनेच्या सागरात आपल्या ह्रदयाचे मंथन करून अमृत बाजुला करून विष काढावे

अशाप्रकारे ध्यानाचा मार्ग अवलंबिण्यासाठी आपल्याला बुध्दीची, विचारांची आणि मनाची शुध्दी करावी लागेल. यामधे जो कचरा साचलेला आहे, तो काढावा लागेल, त्याचे साक्षीदार व्हावे लागेल, अधिक चैतन्य आणावे लागेल. यासाठी ध्यानाचे सारे विधी संकल्प करून भावनांचे विरेचन करून मनाची सफाई करून विरेचनापासून याची सुरूवात होते कारण आत काही राहील्यास, ते बाहेर पडावे असे वाटते. मग भेदभाव दूर करून जागरूकतेत एकरूप होणे शक्य आहे.

परमेश्वराच्या मन मंदीरालाप्राप्त करायचे दोनच मार्ग आहेत. साधना जागरूकतेची असू दे किंवा प्रेमाची मार्ग योगाचा असू दे किंवा समर्पणाचा दोघांचे परीमान एकच आहे. दोन्ही मार्ग आपल्या परमात्म्याकडे घेऊन जातात.

जुन्या जमान्यात योग आणि भक्तिचे मार्ग पूर्णपणे वेगळे होते. ज्याचे स्रीमन होते, त्याच्यासाठी भक्तीच मार्ग अधिक अनूकुल होता, पण आपल्यात जनसंख्या मोठी आहे जवळ जवळ ५०% ज्यात स्री मन किंवा पुरुष मनाला एखाद्या स्पष्ट श्रेणीत ठेवतां येणार नाही. हे असे लोक आहेत ज्यांच्यात बुध्दी आणि भावनेचे प्रमाण अर्धे अर्धे आहे. जर तुम्हाला ही व्दिधा आहे की, आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे तर दोन्हींचा संयुक्तपणे अवलंब करा

जो ध्यानाचा मार्ग निवडतो, तोच शुध्द चेतनेमध्ये विहार करू शकतो. निर्मळ मनाच्या या अवस्थेत भक्तीची मात्रा शक्य असते. जो चेतनापूर्ण आहे, ज्याचे मन निर्मळ आहे, त्याचीच उर्जा जागृत होऊ शकते. त्याच्यातच अहं भाव निर्माण होतो, तोच संगीताचा आनंद घेऊ शकतो, गाऊ शकतो.

Monday, April 20, 2020

कृष्णाला रूक्मिणी मिठासासारखी वाटते

आपण लहान असताना आपल्याला घरातील मोठी माणसे गोष्टी सांगायची. मला ही माझ्या आजी ने गोष्टी सांगीतलेय. माझ्या घरी माझे आजी आजोबा माळकरी असल्यामुळे आमच्या घरात विठ्ठल रूक्मिणी आणि राधा कृष्णाच्या गोष्टी सांगीतल्या जायच्या. अशीच एक कृष्णाची गोष्ट माझ्या आजीने सांगितली होती तीच मी गोष्ट मांडत आहे.   

एकदा  कृष्णा आपल्या दोन्ही बायकांशी गप्पा मारत बसले होते.

गप्पांमध्ये सत्यभामाने विचारले की,......

“नाथ मी आपल्याला किती आवडते?”

त्यांवर कृष्ण म्हणाले,....

“हे सत्यभामे साखरे प्रमाणे आवडतेस.” लगेच रूक्मिणीने हाच प्रश्न विचारला तर कृष्ण म्हणाले, “रूक्मिणी तू मला मिठासारखी आवडतेस.”

हे ऐकून सत्यभामा खुप खुष झाली की आपण पतीला गोडाप्रमाणे वाटतो आणि तिकडे रूक्मिणि रूसुन बसली की मी मिठाप्रमाणे. रागात रूक्मिणी तिथून निघून गेली. आपल्या प्रिय रूक्मिणीला रागावलेले बघून दुसऱ्या दिवशी कृष्णाने स्वयंपाकात मिठ न घालण्याची सूचना दिली आणि जेवनात गोड धोड पदार्थही करायला सांगीतले.

स्वयंपाक तयार झाला. कृष्ण नेहमीप्रमाने जेवले. परंतु जेव्हा रूक्मिणी व सत्यभामा जेवायला बसल्या तर बघतात तर काय पहिलाच घास तोंडात घातल्याबरोबर जणू काही चवच लागली नाही. वरण, भात, भाजी, आमटी, भजी सर्वांची तीच गत.

आधिच रागात असलेली रूक्मिणी स्वयंपाकावर चिडून म्हणाली,.......

“स्वयंपाक फार आळणी झालाय.”भगवंताच्या सूचनेनुसार स्वयंपाकी म्हणाला,”आज मीठ संपले होते, म्हणून जेवन आळणी बनवाव लागले.

अर्धपोट जेवून उठली रूक्मिणी आणि महालात फेऱ्या मारू लागली.

तेवढ्यात तिथे कृष्ण आले आणि म्हणाले,..........

“की जेवन एवढ्या लवकर कसे झाले? आज गोडाधोडाचा स्वाद घेतला नाही वाटत.”

त्यांवर रूक्मिणी रागाने म्हणाली,........

“गोडाचे कौतुक तुम्हाला असेल, पण इतर पदार्थ अगदीच अळणी होते. मिठाशीवाय स्वयंपाकाला जरातरी चव होती का?”

यांवर कृष्ण म्हणाले,.....

“मीठ नसल्याने स्वयंपाकाच्या चव नाही, हे तूच म्हणतेस आहे बघ. मग मी तुला मीठासारखी आवडतेस म्हंटल्यावर तू रागावली.”

पतीच्या बोलण्यातला अर्थ समजल्यावर रूक्मिणीच्या गालाची कळी एकदम खुलन गेली.

Sunday, April 19, 2020

भाऊबीज

    भाऊबीज म्हणजे भावा बहीणीच्या प्रेमळ नात्यांचा उत्सव. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण कार्तिक शुध्द द्वितीये दिवशी असतो. या दिवसाला यमद्वितीया असेही देखील म्हणतात. तर हिंदीत या सणांस भाईदूज असे म्हणतात. पश्चिम बंगालमध्ये भाई फोंटा या नावाने हा उत्सव साजरा केला जातो. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये भाऊबीजेचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नेपालमध्ये देखील हा दिवस भाईतिहार म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थणा करते.

भाऊबीजेच्या दिवशी बहीणी आपल्या भावांना गोडाच्या जेवणाचे आमंत्रण देतात. बासुंदी पुरी हा या दिवसाचा खास बेत असतो. आपल्या भावाला ओवाळून बहिणी त्याच्या कपाळी कुंकवाचा टीळा लावतात. हा टीळा आपल्या भावाच्या दीर्घ आणि आनंदी जीवनासाठी असतो. संध्याकाळी चंद्राची कोर दिसल्यावर बहीण प्रथम चंद्राला ओवाळते आणि त्यानंतर आपल्या भावाला ओवाळते. बहीणीने ओवाळल्यानंतर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहीणीचे कौतुक करतो.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पुजा करते. भावाची पुजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो दीर्घायुषी व्हावा हा यामागे हा खरा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तिप्रमाणे पैसे, कपडे, दागिना अशा वस्तु ओवाळणी म्हणून देतो. या दिवशी सख्खा किंवा दुरचा भाऊ नसल्यास चंद्राला ओवाळण्याची पध्दत आहे, म्हणूनच आपण लहाण मुलांना चंद्राला चांदोमामा अशीच हाक मारायला शिकवतो.

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात?

भाऊबीजेला यमद्वितीया का म्हणतात या माग एक कथा सांगितली जाते. कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पुजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्रे, अलंकार ,वस्तु देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्यास त्यावर्षी तरी यमापासून भय नसते असे मानतात.

यम आणि यमी या भाऊ-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, यम मृत्यू पावला तेव्हा यमीला एवढे दुःख झाले की ती आपले रडणे व डोळ्यातलं अश्रु काही केल्या थांबवेना. तेव्हा अखेर देवाने दिवस संपला असे भासवण्यासाठी रात्र निर्माण केली. मग यमीला भावाच्या मृत्यू मुळे झालेले दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा आहे. आपल्या भावाला दीर्घायूष्य लाभावे यासाठी बहीणीने यमराजाची पुजा आणि प्रार्थणा करायची असते.

“आई नंतर” जर जगात तुमच्यावर जीव टाकणारच कोणी व्यक्ति असेल तर ती म्हणजे “बहिण”
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही आई निर्माण केली. आई फार काळ असु शकत नाही म्हणून त्याने कदाचित आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली. कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी राहते. गुणांच तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरून घालते. बाजू घेउन भांडायला ती सदैव तत्पर असते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने गहीवरलेला असतो.

“बहीण मग ती कोणाचीही असो, तीचा नेहमीच आदर करा…….

हीच खरी भाऊबीज असते………..

Saturday, April 18, 2020

बाप.........बाप हा बाप असतो

    
वडिलांन बद्दल काय बोलायच. बाप… हा बापच असतो. मी एकदा आमच्या शाळेमध्ये एका मुलीच वक्तृत्व ऐकल होत. मला ते खुप आवडले होते. ती वडीलांबद्दल खुप काही चांगल बोलुन गेली. तेच मी ईथे मांडत आहे.

बाबा, पप्पा, ड्याडी, बोलायला ऐकायला किती छान वाटते ना ! पण आपण कधी कधी मुद्दामच जाणून बुजून त्यांना बाप या नावाने संबोधतो. आज अशाच एका बापाची कहाणी.

आई घरच मांगल्य असते तर वडील घराचे अस्तित्व असतात, पण आपण या अस्तित्वाला कधीच समज़ुन घेतले आहे, त्यांच्या विषयी अजून तरी फारसे चांगले बोलले जात आहे……... नाही

लोकांनी वडील रेखाटलेले आहेत ते ही तापट, व्यसनी, चिरखोड, भांडखोर, मारझोड करणारे. असे वडील असतील ते ही ३ ते ४ % पण बाकीच्या चांगल्या वडीलांबद्दल काय?

आई कडे अश्रु चे पाठ असतात ती रडुन मोकळी होते, पण सांत्वन करणारा बाप कोणालाच दिसत नाही. आणि रडणाऱ्या पेक्षा सांत्वन करणार्यावरच जास्त तान पडत असतो कारण ज्योती पेक्षा तो छोटा दिवाच जास्त पेटत असतो. आणि श्रेय मात्र ज्योती घेऊन जाते. रोजच्या जीवनाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शीदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वांनसमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीर तोंड खुपसून मुस्मुसतात ते आपले वडीलच असतात. स्वःताचे वडील जरी वारले तरी त्यांना रडता येत नाही कारण लहान भावंडांना धीर देणे, कुटुंबाला आधार देणारे पण तेच असतात. पत्नी आर्धातच सोडून गेली तरी स्वःताला अवर घालत मुलांच्या अश्रुंना आवर घालणारे ते वडीलच असतात.
जिजाऊ ने शिवबाला घडविले असं अवश्य म्हणतां येईल पण त्यांच वेळी शहाजीराजांची ओढातान लक्षात घ्यावी. देवकी यशोधेच कोतुक अवश्य कराव पण त्यांच वेळी भर पुरात डोक्यावरून पुत्राला घेउन जाणारा वासुदेव आठवावा. राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य आहे पण पुत्र वियोगाने तडफडुन मरणारा राजा दशरथ होता.

वडीलांच्या चीरलेल्या टाचा, झिजलेली चप्पल, आणि फाटलेले बनियन पाहिले की कळते की नशिबाची भोक त्यांच्या बनियन ला पडली आहेत, त्यांचा दाही वाढलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो, मुलांना कपडे घेतील, बायकोला साडी घेतील, पण स्वःता मात्र जुनेच कपडे वापरतील. मुलगा संलुन मधे ५०₹ खर्चतो, मुलगी पार्लर मधे १००₹ खर्चेल, पण त्यांच घरातील बाप मात्र दाढीचा साबन संपला तर अंघोळीच्या साबणाने दाढी करतील, कधी कधी तो ही नसला तर नुसती पाणी लावून दाढी करतील. बाबा कधी आजारी पडले तर डाॅक्टर कडे जात नाहीत, मुळात ते आजारपणाला घाबरताच नाहीत, त्यांना काळजी असते ती डाॅक्टर सांगतील महिनाभर आराम करायला. त्याच्या पुढे काही नशिबाने वाडुन ठेवलेल असत. मुलीच लग्न, मुलाच शिक्षण, घरातील सर्व खर्च याची काळजी असते कारण घरात कमवणारा तो एकटाच असतो.
ऐपत नसली तरी सर्व खर्चात काटकसर करून मुलाला मेडिकल, इंजिनीअरिंग या सारख्या महागड्या शिक्षणाचा खर्च सोसतात. महिन्याचा पगार झाला की सर्व खर्चात बचत करून , काटकसर करून पहिला मुलाला पैसे पाठवतात, खर तर मला सर्वच मुले म्हणायची नाहीत पण काही मुले आहेत की बापाने दीलेल्या पैस्याने शिक्षण कमी आणि मजाच जास्त मारतात. एवढच नव्हे तर या सगळ्यात आपल्याला पैसे पाठवनाऱ्या बापाची टिंगल टवाळी करत असतात. हीच मुले एकमेकांच्या वडीलांच्या नावाने हाक मारतात.

ज्या घरात बाप असतो त्या घराकडे कोणाची वाकडी नजर करून पाहण्याची हिम्मत होत नाही. कारण त्या घरातला कर्ता जिवंत असतो. जरी तो काही करत जरी नसला तरी तो त्या पदावर असतो आई असण्याला अथवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ प्राप्त होतो.

कोणत्याही परीक्षेचा निकाल लागला कि जवळी वाटते ती आई, कारण ती कौतुकाने जवळ घेते, आपले लाड करते, पण गुपचूप जावून पुढे आणनारा बाप कोणालाच दिसत नाही. चटका बसला की तर लगेच “आई ग” हा शब्द आपण उच्चारतो पण एखादा मोठा रस्ता ओलांडताना अचानक जर एखाद्या ट्रक ने जोरात ब्रेक मारून मोठे संकट टाळले तर त्या वेळी आपण “बाप रे…..!” असे म्हणतो. छोटी छोटी संकटे आई सोसती हो, पण मोठी वागळे पेलताना बापच आठवतो……..

एखाद्या मंगल प्रसंगी अखंड कुटुंब सहभागी होत असते, पण जर एखाद मयत झालं तर बापाला एकट्यालाच जाव लागत. मुलाच्या नोकरी साठी लाचार होणारा बाप, मुलीच्या स्थळासाठी उंभरे झिजवनारा बाप, घरच्यांसाठी स्वःच्या व्यथा दडपवनारा बाप खरच किती ग्रेट असतो.

बापाचे खरे महत्त्व ज्यांना कळते ज्याचे वडील लहानपणीच जातात आणि घरच्या सर्व जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात. एकेक गोष्टीसाठी त्यांना कष्ट कराव लागत तेच बापाच महत्व समजतात

बापाला समज़ुन घेनारी एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे त्याची मुलगी, सासरी गेल्यावर ही अथवा घरापासून दुर असताना ही फक्त फोनवर बोलताना वडीलांचा आवाज जरी बदलला असला तरी त्यावरून सतरा प्रश्न विचारेल

वडिलांना खऱ्या अर्थाने ओळखते ती मुलगीच असते. आणि वडिलांना जपनारी त्याची काळजी घेणारी ही मुलगीच असते…………..

“Father is someone who has faith in you even when you fail”


कोणी आपली गाडी २ मिनीटासाठी

मागितली तरी आपला जीव खाली वर होतो

आणि तो बाप लहानपणापासुन जपलेली बाहुली

हसत हसत दुसऱ्याला देऊन टाकतो………. बाप ……..बाप हा बापच असतो.

त्यांच मन कोणालाच न कळण्यासारख असत ……………...

Friday, April 17, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग ३


शाळा म्हटली की जसा फळा आठवतो तसे एकदम रिकामे बाक ही नजरे समोर येतात. स्वत:च्या हक्काची जागा आणि आपले अस्तित्व दाखवणारी एकमेव जागा म्हणजे आपला बाक. तो बाक आपल्या आयुष्यात एवढा महत्वाचा ठरू शकेल हे कधी स्वप्नातही न सुचलेले. बाकावर दप्तर ठेवणे, बाकाच्या खालच्या कप्यात वह्या पुस्तक ठेवणे. परीक्षेच्या काळात कॅापीचा कागद बाकाच्या खाली लपवने, रिकाम्या वेळात तबला समजून वाजवणे असे एक ना अनेक रूपे बाकाची. याचं बाकावर डोके ठेऊन झोपलेले. मार्कांची लाज वाटली की बाकात डोके खुपसायचे, पेन-पट्टीचा खेळ याचं बाकावर रंगायचा. शिक्षकांनी डस्टर आपटल्यावर बनलेल्या खडूच्या पाउडरच्या ठश्यात बोटाने रांगोळी काढण्यात मजा यायची ती वेगळीच. शिक्षकांनी पुस्तके वह्या काढायला सांगितली की दोनंदा-तिनदा स्वतःच्या बाकावर जोरात आपटून वर्गात तात्पुरती अशांतता पसरवने. या सर्व करामती केवळ एका बाकामुळे शक्य झाल्या.


पुढे वर्ग वाढला, बाकांची उंचीही वाढली. गणितात कर्कटक जेवढे वापरले नसेल तेवढे ते बाकावर वापरले. मध्येच एखादी नक्षी, मग स्वतःच्या ग्रुपचे नाव, मैत्रीणिंची नावे, मधूनच बाकाला होल पाडने अश्या अनेक गोष्टी कर्कटकाच्या सहाय्याने केल्या. बाकावर पडलेले शाईचे डाग, चित्रकलेच्या तासाला सांडलेले रंग, काही आगाऊ मुल बाकावरून चालल्यामुळे उमटलेले मातीने ठसे, मधल्या सुट्टीत बाकावर बसुन जेवलेली ती मजा काही वेगळीच होती. पण बाकाचे अस्तित्व खरे तेंव्हा जाणवायचे जेव्हा डोके बाकावर ठेवलेले असताना बोटाने हलके ठोकुन कानाने त्याचे पडसाद ऐकतो.

चार भिंतीची माझी शाळा ।

पांढऱ्या भिंती आणि फळा काळा ॥

तो शाळेतला विशाल फळा नाही आठवला असे होनारच नाही. शिक्षकांनी फळ्याकडे तोंड केले की शांत बसलेल्या मुलांमधे चुळबुळ सुरू व्हायची. सगळ्यां समोर शिक्षा केली की मात्र लाज वाटायची. फळ्यावरचा सुविचार रोज नविन काहीतरी शिकवून जायचा. वर्गप्रमुख जेंव्हा वर्ग सांभाळायचा तेंव्हा बोलणाऱ्या मुलाची नावे फळ्यावरच लिहीत असे आणि एवढे करून तो मुलगा बोलत असेल तर त्याच्या नावांपुढे फुल्या चढवल्या जात. वहीत शंभर वाक्य लिहीली असली तरी खडुने फळ्यावर लिहीण्याची शान वेगळीच होती.

शिक्षक फळ्यावर लिहीत तेंव्हाही मजा वाटे. काही शिक्षक मोत्यासारखे वळणदार अक्षरात लिहीत असे तर काही शिक्षकांच्या अक्षरांची आगगाडी कधी वर तर कधी खाली जात असे. चित्रकलेचे सर थोड्याच वेळात दोन रंगाच्या खडूंचा वापर करून अप्रतिम चित्र काढत तर विज्ञानाचे शिक्षक चार रंगांचा खडु वापरूनही प्रयोगाची आकृती धड काढत नसे. इतिहासाच्या तासाला फक्त सनावळ्या लिहील्या जायच्या तर गणिताच्या तासाला तो मोठा फळा ही कमीच पडायचा.

तर असा हा फळा. एकाच रंग, एकच आकार पण असंख्य गोष्टी त्याच्याशी जडलेल्या. कित्येक गोष्टी त्याच्यावर लिहील्या गेल्या, आणि पुसल्याही गेल्या. आज परत शाळेत जायचा योग आला, तर आवर्जून मी त्या वर्गातल्या बाकावर बसेन जरी मला त्यात नीट बसतां नाही आले तरी. आजही त्या फळ्यावर सुविचार लिहायचाय. आज सर्व काही झपाट्याने बदलत असताना तो ‘बाक’ आणि तो ‘फळा’ आणि त्याचा स्वतःचा असा विशिष्ट वास अजून स्मरणात आहे.

Thursday, April 16, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग २

वेळापत्रकाप्रमाने जरी शाळा भरली असली तरी जो पर्यंत शिक्षक वर्गात येत नाहीत तो पर्यंत खऱ्या अर्थानेशाळा भरत नाही. आमची पहिलीच batch होती ती semi-English ची, म्हणजे आम्ही पाचवी ला गेलो आणि Semi-English चालु झालं. म्हणजे काय ३ विषय मराठी भाषेतून आणि ३ विषय English मधुन. शिक्षकांना वाटले आताच पोरं मराठीतून English कडे वळलेत थोडीशी सूट द्यावी त्यांना. तो पाचवीचा आमचा वर्ग खुप लाकडा होता पुर्ण शाळेचा. मस्ती तर खुपच करायचा तेवढाच हुषार पण होता.

वर्गातला ती पहिली तासिका नेहमीच वर्ग शिक्षकांची असायची. डस्टर आपटल्याचा आवाज आला की शिक्षक वर्गात आलेत असं कळायच. त्या डस्टरच्या आवाजानेच मित्रांशी गप्पा मारणारा बेसावध मुलगा भानावर येउन सर्वात शेवटी उभा राहतो. त्याचे उभे राहणे आणि आणि इतरांचे खाली बसणे एकाच वेळी झाले की वर्गात हास्यकळोळ व्हायचा. हजेरी सुरू व्हायची. काही वेळेस नावं वाचून हजेरी घ्यायचे शिक्षक नाहीतर काहीवेळा हजेरी क्रमांका वरून. शिक्षकांच्या नजरा खाली असल्यावर ‘हजर’ आणि ‘गैरहजर’ बोलायला मजा यायची. काहीवेळा तर दूसऱ्यांची हजेरी द्यायचो आम्ही.

मुलांचे वाचन किती आहे आणि ते वाढावे, त्यांना नविन शब्दांचीच ओळख व्हावी, म्हणू आणि वाकप्रचार स्वत:हून वाक्यात उपयोग करणे अशी काही ‘निबंध’ लिहीण्यामागे कारण असतं. मात्र शाळेच्या मुलाच निबंध वाचले की त्यांचे वाचन, निरीक्षण आणि साधेपणातुन होनारी विनोदी निर्मीति यांचे दर्शन घडवते. बऱ्याचदा निबंधची अभंगातील ओळ किंवा एखादी म्हण या पासुन सुरूवात होते. पहीलांदा लिहायला लागल्यावर निबंधाचा विषय सोपा वाटू लागतो आणि पेन हातात घेतला कि काय लिहू आणि कसे लिहू असं वाटायच. थोड तिरक्या नजरेने समोरच्यान काय लिहीले आहे बघायच दोन ओळी दिसल्या की वेळ न घालवतां ते स्वत:च्या वहीत लिहायच.

इंग्रजी निबंध लिहायला सांगितला की आम्ही ते रट्टा मारून पाठ करुन व त्यातूनच विनोदी निर्मिती करायचो. एकदा मराठी पत्र लिहा असे सांगितले पत्राचा विषय होता. ‘तुमच्या मित्राच्या आईचे निधन झाल्यावर मित्राचे सांत्वन करा.’ त्यात एका मैत्रीणीने पत्राची सुरवात रट्टा मारल्या प्रमाणे उजव्या बाजुस पत्ता, खाली प्रिय मित्र राजु यास, वगैरे केली. पुढे मात्र तीच्या पत्राला खरा रंग चढवला. काल तुझे पत्र मिळाल आनंद झाला. मी तुझे पत्र वाचले. वाचून दू:ख झाले. अश्या विषयांशी निगडीत वाक्य लिहून, “ तुझ्या आई-वडीलांना माझा नमस्कार सांग” असे लिहून तिने पत्राचा शेवट केला.

आता ई-मेल काळात पत्रे लिहीण्याचा योग येत नाही. C.I.D. आणि M.B.B.S. या शब्दाते विस्तारीत रूप माहीत आहे पण शि.सा.न.वि.वि. अजुन कोड्यात आहे. आता मुद्दाम प्रयत्न करुनही एवढे साधे निबंध व पत्र लिहीता येनार नाही. चुकून फक्त शाळेची वही सापडली की थोडा वेळ ती वाचून हसायचे एवढेच उरले आहे.

Wednesday, April 15, 2020

माझ्या आठवणीतील शाळा. भाग १

                                                माझ्या आठवणीतील शाळा. भाग १

आपण आपल्या जीवनाची बारा वर्ष शाळेय जीवनात घालवले. या वर्षात आपण खूप काही कमावले आणि बरेच काही गमावलेही. आपल्या शाळेच्या कडु-गोड प्रसंगावर वेगळ्या नजरेने बघुन त्याला प्रकाशझोतात आणण्याचा माझा छोटासा प्रयत्न. मला नक्की खात्री आहे कि या अनुभवातून तुम्हांला ही तुमच्या शाळेच्या गमतीजमती आठवतील.

शाळा, शाळेचा बाक, फळा, रंगीत चित्रानी सजलेली शाळेची भिंत, सुविचार, परीक्षा, स्पर्धा, परिपाठ, गृहपाठ, सहल, शिक्षक, मित्र-मैत्रिणी, शिक्षा, वत्कृत्व स्पर्धा, शिपाई काका, ग्रंथालय, संगणक विभाग, प्रयोगशाळा, वाढदिवस, गणवेश, सण, दिवाळीची वही, ॲाफ पिरेड, डबा, शिक्षक दिन, बालदिन, प्रजासत्ताक दिन तसेच स्वातंत्र्य दिन, प्रार्थणा, मराठीचे भन्नाट निबंध आणि इंग्रजीचे अजब स्पेलिंग. गणितातील सुत्रे व इतिहासातील इसविसन, हिंदीचे व्याकरण त्यांच बरोबर सर्वात महत्वाची शाळेची घंटा या सर्वांचा विचार तुमच्या डोक्यात आला असणारच.तर उजळुया जुन्या आठवणी आणि भरवूया आपल्या मनांत आपलीच शाळा.

शाळेचा तो पहिला दिवस. पहिली त होते त्या वेळेच काही आठवत नाही, पण पाचवीचा आठवतो. नविन शाळा, नविन शिक्षक माझ्यासाठी सगळंच नविन होत. पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश केला तेव्हा खुप छान वाटत होत. शाळा भरली. शिक्षक शिकवायला सुरूवात करतात. शेजारीची परकी मुलगी आपली मैत्रीण बनते. पहील्यांदाच बाकावर बसवण्याच फिलिंग वेगळच होत. दुपारी एकत्रित बसुन जेवन करन सगळंच वेगळ होत माझ्यासाठी. मग घंटा वाजते शाळा सुटल्याची बाबा बाहेर उभे असतात आपल्याला घेउन जाण्यासाठी मात्र आपण नविन शाळेत एवढे रमलेलो असतो की आता तिथेच राहावसे वाटते. परंतु निघणे गरजेचे असते. घरी आल्यानंतर ओढ लागते ती दुसऱ्या दिवसाच्या शाळा भरणाऱ्या घंटेची.

सकाळच्या शाळेचा राग फक्त हिवाळयाच्या दिवसातच यायचा. सकाळी लवकर उठायला लागायचे. थोडा वेळ उभ्या उभ्या ही झोप यायची. आईच्या ओरडण्याने मात्र पार झोप उडून जायची. मग धावतच शाळेत जायचे. उशीर झाला की सकाळच्या शांत वेळात शाळेच्या परीसराजवळ आल्यावर प्राथनेचा आवाज ऐकु यायचा. प्रार्थणेला नाही वेळेत पोचलो की शिपाई काका आमच्या कडुन मैदान साफ करून घ्यायचे. त्याची नजर चुकवून आम्ही वर्गात पळायचो. .

प्रार्थणा ही मुलांना शिस्त लावण्याचा एक मार्ग. पण बऱ्याचदा तो व्यर्थ जातो. आम्हाला मंचावरून शिक्षकांची सूचना असायच्या एका रांगेत उभे रहा. दोघांमधे एका हाताच अंतर असु द्या. उंचीप्रमाणे उभे रहा. आमच्या कडुन हात जोडून प्रार्थणा म्हणायला लावतात. बऱ्याचदा स्पिकरवरुन प्रार्थणा ऐकवली जाते आणि मुले हात जोडुन उभे असतात. या सर्व चित्रात पहिल्या दोन रांगेतील मुलेच शांतपणे शहाण्या मुलांसारखं डोळे मिटून प्रार्थणा म्हणत असतात. शेवटच्या आणि गर्दीचा फायदा घेणाऱ्या मधल्या रांगेतील मुल आपल्या स्वःताचाच दुनयेत असतात. कोणी मध्येच स्वर उंचावनार, मध्येच कोणीतरी ओरडणार. काहीजण मुद्दामच शब्द मागून बोलल्यानंतर तो उच्चारणार. काही मस्तीखोर मुले बाजुला उभ्या असलेल्या शांत मुलाला त्रास देण्यास व्यस्थ असतात. मध्येच एकजण शेजारच्या मुलाला बाजुच्या उभ्या असलेल्या मुलीवर ढकलणार. मैदानात बसलेलो असताना जवळची दगडी मागे न बघताच फेकणार आणि सर्वात जास्त मजा, सर्व कार्यक्रम झाल्यावर मागच्या मुलीच्या उठण्याच्या आधी उठून स्वःतची मातीने भरलेले कपडे झटकण्यात येते. वर्गात जाताना हाताचा घडी घाला आणि एका रांगेत वर्गात जावा अशा सूचना असायच्या आम्हाला. पण शिक्षकांच्या सुचना ऐकतील ती मुल कसली. आमच्यात शर्यत लागायची कोण पहिला वर्गामध्ये जातय त्याची. आम्ही पळतच जीण्यावरून वर्गात जायचो.

पण ही सर्व मजा करत असताना कळत नकळत आमच्यावर त्या प्रार्थनेचे संस्कार होत होते. प्रार्थणेतून मिळणाऱ्या उत्साहानेच संपुर्ण दिवस चांगला जायचा.आज मात्र त्या शाळेसमोरून जाते तेव्हा ती शाळा ते मैदान आणि मातीने माखलेल्या त्या कपड्यांची उणीव भासते.





Tuesday, April 14, 2020

कन्यादान

कन्यादान म्हणलं की आई बाबांच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस. असाच एक अविस्मरणीय कन्यादानाची गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर आली. तुम्हाला वाटत असेल माझ्या लग्नाचा दिवस असेल, हा तो दिवस तर कधीच विसणार नाही मी. पण! असा एक दिवस होता तो माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस ठरला.

आज किशौरीच लग्न होत….. पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते…… पूर्ण घर फुलांनी सजवले होते……

किशोरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती….. नाजुक सुंदर…. खुप खुश होती ती….. तीच ते चेहऱ्यावरच मोहक हास्य तीच सौंदर्य आणखी खुलवत होते……. तिचा होणारा नवरा अभि तिच्याकडे प्रेमाने पाहत होता…… काही दिवसांपूर्वीच अभि तीला पाहायला आला होता….. आणि बघताक्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता….. खुप सुंदर जोडी होती त्यांची……

पण थोड्याच अंतरावर सयाजीराव उभे होते…. किशोरीचे बाबा….. खुप कौतुकाने मुलीकडे पाहत होते….. किशोरीच्या चेहऱ्याकडे पाहत पाहत ते भुतकाळात हरवले……. किशोरीचा चेहरा तिच्या आई सारखाच होता…… साधी सरळ होती तिची आई…… मोठ्या थाटात लग्न झालं होत त्यांचं…...एक वर्षांचा सुखी संसार झाला असेल त्यांचा…… मग चाहुल लागली येनाऱ्या बाळाची……. खुप जपायचे सयाजीराव त्यांना…….. पण …… पण प्रसूतीचा वेळी अघटित घडले……. आणि एका मुलीला जन्म देऊन……. तिने निरोप दिला या जगाला…...कायमचा…..

सयाजीराव कोलमडले होते…….पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पाहीलं…… तिचे डोळे आईला शोधत होते……. त्यांनी तिला उचलून घेतले……. अगदी कुशीत….. खुप रडले…… पण शेवटच……. त्या दिवसानंतर त्यांच्या डोळ्यात आजच पाणी आल होत….. त्यांचे डोळे भरून आले होते…… भरल्या डोळ्यानी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते……..

कीशोरीने तिच्या बाबांकडे पाहिलं…...त्याचे भरलेले डोळे बघुन तिच पण मन भरून आल…..तिला आठवले जुने दिवस…...तिचे बाबा हेच तिच जग होत…… जसं कळतय तसं तिचे बाबा तिची आई बनले होते….. आईची आठवण तिला कधीच आली नव्हती……. तिला हे पण समजलं की तिच्या बाबांनी फक्त तिच्यासाठी दुसर लग्न केलं नव्हत…..तिची किती काळजी करायचे तिचे बाबा….नोकरी सांभाळताना कधीच तिच्याकडे दु्र्लक्ष केलं नाही…….

आजारी पडली कि रात्र रात्र न झोपतां तिच्या बाजुला बसुन रहायचे….. शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडुन परत जाताना चार वेळा वळुन पाहायचे….

किशोरीला पण बाबांन बद्दल खुप जिव्हाळा होता…… आपल्या नंतर त्यांची कोण काळजी घेणार….?? किशोरीच मन अस्वस्थ झालं…...आणि तिला आठवला मागच्या महिन्याचा प्रसंग…..

किशोरी झोपली होती…. अचानक तिला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला...ती जागी झाली आणि पळतच बाबांच्या खोलीत गेली…. तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते…..तडफड करत होते….तिला काय करावे सुचेना……

“बाबा... बाबा... काय होतय….???” तिने पळत जाऊन पाणी आणल…. पण ती परत येई पर्यंत ते शांत झाले होते….. हातातील पाण्याचा पेला अलगद खाली गळुन पडला….आणि ती तिच्या बाबांना हाक मारु लागली…..रडू लागली…...आणि अचानक सयाजीरावांचे श्वास पुन्हा चालु झाले…… आणि उठूनच बसले…..किशोरी त्यांना बघून रडू लागली….ह्रदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता…...कसे बसे वाचले होते ते……. किशोरीला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे….

त्यादिवसापासुन तिचे बाबा तिच्या लग्नाच्या मागे लागले…..विवाह संस्था मध्ये चकरा मारू लागले…… मध्येच वकिला कडे पण जायचे…. जेवनाचे भान नाही की आराम नाही……. सतत फक्त तिच्याच लग्नाचा विषय….त्या चिंतेमुळे कि काय त्यांची तबियत पूर्ण ढासाळली होती….. डोळे आत गेले होते…….चेहरा निस्तेज दिसत होता….. अशातच एक दिवस अभि च स्थळ आल….. देखणा मुलगा… चांगली नोकरी…..घरंदाज घरान सर्वकाही एकदमच व्यवस्थित……..

त्यांच्याकडुन लगेच होकार मिळाला….. किशोरीने पण लाजून होकार दिला…… तिच्या बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती…… सर्वकाही एकदमच गडबडीत…… किशोरी काय बोलली तर ते बोलायचे…. “ मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे…….”

आता कन्यादानाची वेळ आली होती….. भरल्या डोळ्याने आणि जड अंतकरणाने त्यांनी कन्यादान केलं…… जाताना खूप रडले दोघे…...किशोरीचे तर पाय निघतच नव्हते बाबांना सोडुन जाताना….. पण जगाची रीतच होती….. किशोरी गेली…… पाहुणे पण गेले…..तिचे बाबा खुप वेळ एकाच जागी बसलेले होते……. नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले…….

दुसऱ्या दिवशी किशोरला वाईट बातमी मिळाली…. तिचे बाबा हे जग सोडुन गेल्याची….. ति आणि अभि लगेच निघाले…… लोक जमले होते….. किशोरी खुप रडत होती…. तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर…….अंतविधि पार पडला….. किशोरी अजुनही रडतच होती…. तेवढ्यात तिच लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेल…… ज्यावर पेपर वेट म्हणुन तिची बाहुली ठेवली होती……. तिने ति चिठ्ठी उचलली……. खाली घर आणि जमीनीचे कागदपत्र होते….जे त्यांनी दोन आठवड्या आधीच तिच्या नावावर केलं होत…...ती चिठ्ठी वाचू लागली….

माझी छकुली………

“तु आधी डोळे पुस…..तुला माहीतच आहे की मी तुला रडताना बघु शकत नाही…. एक ना एक दिवस हे होणारच होत…… नको रडूस…… मी खरच खुप भाग्यवान आहे कारण या जगात मुलीचा बाप असणं ही भाग्याची गोष्ट आहे….. पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आल….. खुप समजुदार निघालीस तू……. कधीच आईचा हट्ट केला नाहीस….. तरी पण माझ्याकडून काही कमी राहीली असेल तर माफ कर पोरी…. तुला आठवत असेल त्या दिवशी मला ह्रदय विकाराचा झटका आला होता….. खर तर तेंव्हाच मी हे जग सोडल होत….. माझ्या समोर अंधार पसरला…..माझ्या समोर रेड्यावर बसलेला काळाकुट्ट धिप्पाड व्यक्ति होता. त्याच्या हातात मृत्यू पाश होता….. जो माझ्या भोवती आवळला जात होता…. मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्यासाठी हे शरीर मागून घेतले … माझ्या विनंती ने नाही पाहून तुझी आर्त साद ऐकुन त्यांनी मला एवढा वेळ दिला…. मागचा महिना जो तुझ्याबरोबर होता तो फक्त आत्मा होता… ज्यांच शरीर उधारीवर शिल्लक होत… पण माझ काम झालं आता….. वकिला कडून सर्व मालमत्ता तुझ्या नावावर केलीच आहे. पण मला जे हव होत ते मिळाले. मी कन्यादानाच पुन्य मिळवलं. यातच सर्व काही आहे. आणि आता डोळे पुस आनंदाने आयुष्य जग… सर्वांना आनंदी आणि सुखी ठेव माझा आशिर्वाद सतत तुझ्या सोबत राहील… सुखी रहा पोरी…..”

तुझाच बाबा………..

किशोरीचे अश्रु थांबतच नव्हते. तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यू कडून पण वेळ काढून थांबलेले होते..ते पण तिच्या कन्यादानासाठी …. एका मुलीचा बापच हे करू शकतो……. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला….. मागे अभि होता…. त्याने तिचे अश्रु पुसले आणि बोलला ……..” मी तुझ्या डोळ्यात अश्रु नाही पाहु शकत….” किशोरी बिलगली…… पिता नंतर आता पतीच तिच सर्वस्व होता…………...