Wednesday, May 20, 2020

तारक मेहता का उल्टा चश्मा


 तारक मेहता का उल्टा चश्मा म्हटले की आपल्याला sub tv वरची मालीका आठवते. ती मालीका आपल्याला इतकी आवडते की अस वाटत त्यामधले सगळी पात्र आपल्या आसपास आहेत. ती मालीका २००८ मध्ये sub tv वर सुरू झाली. त्या मालीकेने खुप कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकले. ती मालीका १२ वर्ष झाली अजुन पण चालू आहे. आज आपण या मालीकेवर एवढ बोलतोय याच कारण, की तारक मेहता का उल्टा चश्मा मधले real मेहता ते आपल्याला माहीतच नाहीत. तारक मेहता हे कोण होते. ते काय करत होते. ते आपण पाहणार आहोत.

तारक जानूबाई मेहता हे भारतीय स्तंभलेखक, विनोदी, लेखक आणि सर्वोत्तम नाटककार म्हणून प्रसिध्द होते. ते अनेक विनोदाचे गुजराती भाषांतर केले, आणि रूपांतर केले. ते गुजराती नाट्यसृष्टीतील एक प्रसिध्द व्यक्तिरेखा होते. तारक मेहता गुजरात मधील अहमदाबादमध्ये जन्मले आणि जैन कुटूंबात वाढले आहेत. त्यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ मध्ये झाला.

मार्च १९७१ मध्ये चित्रलेखनामध्ये हास्यास्तद साप्ताहिक स्तंभ प्रथम प्रकाशित झाला आणि तेव्हापासून समकालीन विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. त्यांनी ८० पुस्तके प्रकाशीत केली, तिन पुस्तक त्यांनी दिव्य भास्कर या गुजराती वृत्तपत्रात लिहिलेल्या स्तंभावर आधारीत आहेत तर उर्वरीत तारक मेहता का उल्टा चेश्मा कथा संग्रहित केली आहे.
वैयक्तिक जीवन

                  
तारक मेहता गुजराती जैन समुदयाचे होते. ते गुजरात मध्ये अहमदाबाद येथे वास्तव करीत होते, जेथे ते २००० पासुन दुसऱ्या पत्नी इंदूसह ३० वर्षा पेक्षा जास्त काळ ते तेथे राहिले. नंतर मनोहर दोशींशी लग्न करणारी त्यांची पहिली पत्नी इला(died 2006) त्यांच अपार्टमेंट मध्ये राहत होती. पहील्या लग्नापासुन त्यांना एक मुलगी आहे. इशानी ती अमेरीकेत राहते. आणि तिला दोन मुले आहेत कुशल आणि शौली.
पुरस्कार

                    
२०१५ मध्ये त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुजरात साहित्य अकादमीने २०११ मध्ये त्यांना साहित्य गौरव पुरस्कार आणि २०१७ मध्ये रमनलाल नीलकंठ हस्या पारितोषिक प्रदान केले.
ग्रंथसंग्रह

१. दुनिया ने ओंधा चश्मा

२. आ दुनिया पंजारापोले

३. ॲक्शन रीप्ले

४. अल्बेलून अमेरिका व्हॅंथेलून अमेरिका

५. चंपकलाल तापुनी जुगलबंदी

६. बेताज बटाली बाज पोपटलाल ताराज

७. तारक मेहता का उल्टा चश्मा
मृत्यु
                          
तारक जनुभाई मेहता यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी १ मार्च २०१७ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटूंबीयांनी त्यांचे शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान केले होते.

Saturday, May 16, 2020

टिकटाॅक vs युट्युब :- कॅरीमिनाटी

इंटरनेट ही मजा करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आणि एखाद्या गोष्टींची पटकन माहिती मिळवण्याचे साधन आहे. परंतु इंटरनेट च्या जगावर बऱ्याच मारामारी देखील होतात. बरेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहेत आणि बरेच लोक या प्लॅटफॉर्मवर त्यांच content पोस्ट करून नशीब बनवण्याचा प्रयत्न करतात परंतु केवळ काही लोकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळते. असेच ते हळू हळू इंटरनेटच्या दुनयेत नाव कमवतात. आणि ते स्वतः एक ब्रॅंड तयार होतात.

आपण आज अश्या मुलाबद्दल बोलनार आहोत जो स्वतः एक इंटरनेटच्या दुनियेचा ब्रॅंड आहे. त्याचे video बघून मोठमोठ्या लोकांची पायाखालची जमिन सरकते. त्या मुलाच नाव आहे. अजय नागर . काहींनी नावावरून ओळखले असेलच.

                                  

अजय नागर, व्यावसायीक रित्या कॅरीमिनाटी म्हणून ओळखले जाते, एक भारतीय काॅमिडीयन, गेमर, रेपर आणि युट्यूबचे व्यक्तीमत्व आहे. तो भारतातील सर्वात लोकप्रिय युट्यूबर्सपैकी एक आहे. आणि कॅरीमिनाटी आणि कॅरीसलाइव्ह हे त्याचे युट्यूब channels आहेत. त्याच्या व्हिडीओंमध्ये मुख्यतः गेमप्ले आणि पॅरोड, काॅमेडी आणि व्हायरल व्हीडीओ आहेत

कॅरीमिनाटी १० वर्षाचा असल्यापासुन युट्यूब व्हिडीओ पोस्ट करण्यास सूरवात केली. त्याने व्हिडीओ गेम्स व त्याच्याव्दारे सादर केलेल्या सनी देओलची नक्कल करणारे व्हिडीओ पोस्ट केले. त्याचे मुळ युट्यूब channel कॅरीमिनाटी हे २०१४ मध्ये सुरू झाले. आणि दुसरे कॅरीसलाइव्ह हे युट्युब channel त्याने २०१७ मध्ये गेमिंग साठी सुरू केले. सध्या कॅरीमिनीटी या चॅनेलवर 1.04B इतके views आहेत आणि त्याचे 12.2 M subscribers आहेत. दुसऱ्या चॅनेलवर 4.28M subscribers आहेत. त्याच्या आकडेवारीनुसार आणि प्रेक्षकांच्या प्रभावानुसार तो भारतातील सर्वात मोठा You Tuber आहे.
                                  
सध्या, युट्यूब आणि टिकटाॅकर्स आणि त्यांच्या content निर्माते यांच्यात अनुक्रमे इंटरनेटवर मोठी लढाई चालू आहे.

युट्यूबला सुमारे दशकांहून अधिक काळ लोटला आहे, तर काही वर्षांपूर्वी टिकटोक ने प्रवेश केला.आणि बघतां बघतां टिकटोक ची लोकप्रीयता खूप उच्च दराने वाढली. हे दोन्ही प्लॅटफॉर्म एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत परंतु आजकाल या प्लॅटफॉर्मचे वापरकरते तोंडी युध्दामध्ये व्यस्थ आहेत. आणि एकमेकांना रोस्ट करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

युट्युब VS टीकटॅाक

मागिल काही आठवड्यांपासून युट्युब आणि टिकटॅाक यांच्यात व्हर्चुअल युध्द चालू आहे ते भारतातील सर्वात लोकप्रिय व्यासपिठ आहे. हा विषय गेल्या २ वर्षापासून चर्चेचा विषय आहे. बऱ्याच लोकांना टिकटॅाकर्स बहुतेक आवढत नाहीत. कारण ते content च्या नावाखाली कसलेपण फालतु व्हिडीओ पोस्ट करतात. आणि लोक त्या content ला चांगले बोलतात.
                                   
टीकटाॅक वरून ही बाब उधळली गेली की, अमिर सिध्दिकी याने IGTV व्हिडिओ पोस्ट केला जेथे त्याने या परिस्थिती बद्दल सांगितले आहे. काही सत्य शेअर केली त्यामुळे त्याच्या व्हिडीओमुळे काही प्रसिद्ध युट्युबर्स रोस्ट झाले. मग काही प्रेक्षकांनी युट्युबर्स कडून प्रतीउत्तराची मागनी केली. बऱ्याच युट्युबर्सनी या विषयावर Angry prash, saiman says इत्यादींसारखा युट्यबर्स ने व्हीडीओ बनविले पण कॅरीने यांवर एक व्हिडीओ बनवावा अशी लोकांची इच्छा होती. लोकांच्या विनंती वरून कॅरीने एक व्हिडिओ बनवला TikTok vr you tube आणि पोस्ट केला.

१२.३७ सेकंदाचा व्हिडीओ त्वरित व्हायरल झाला आणि त्या व्हीडीओ ने कॅरीच्या चॅनेलचे आत्तपर्यंतचे viewes चे रेकाॅर्ड तोडून टाकले. त्याच्या चॅनेल चे subscribers ची संख्या वाढली.

Thursday, May 14, 2020

एक असा माणूस जो स्वतःच्या पैशाने दुसऱ्यांच्या घरची नळ ठिक करतो


                                                  
 आपण कीती पाणी वाचवतो दिवसात? आणि किती वाया घालवतो? हे आपल्याला कळत नाही. आपण लहानपणापासुन ऐकत आलोय की पाणी वाचवा पाणी जिरवा. पण हा नारा कितीजण अंमलात आणतात कोणास ठावूक. आपण नेत्यांची भाषण ऐकतो की पाणी जमवण्यासाठी आम्ही हे करू ते करू …. पण सत्य काय आहे निवडून आल्या नंतर दुष्काळ भाग हा दुष्काळच राहतो. तिथले लोक दरवर्षी पाण्यासाठी झगडतात. दरवर्षी तिच परिस्थिती राहते…. असो. मला एवढच म्हणायच आहे की थोडंसं आपण घरामधे पाणी वाचवले तर खुप पाणी वाचेल ते नंतर आपल्यालाच उपयोगी येईल.

मी पाण्याबद्दल एवढ बोलते कारण एक अशी व्यक्ती आहे की या जगामध्ये की तिने एक वेगळा मार्ग शोधला. त्यांच नाव आहे आबिद सुरती. राष्ट्रीय पारितोषिक विजेता लेखक सुप्रसिध्द चित्रकार, नाटककार, कार्टूनिष्ट. खर तर एवढी ओळख पुरेशी आहे, किंबहुना जास्तच आहे.निवरूत्ती नंतरच आयुष्य आठवणी काढत जगायला. पण आबिद सुरती हे स्वस्थ बसणारे नव्हते. खरतर आपल्याकडे कोणीच स्वस्थ बसत नाही. नको त्या गोष्टीत ढवळाढवळ करत बसणं हाच उद्योग बऱ्याच लोकांचा पण स्वस्थ न बसणारा प्रत्येक माणूस अस्वस्थ असतो असही नाही. आबिद सुरती मात्र अस्वस्थ होते.तिथल्या बेसिन च्या नळाची टपटप त्यांना अस्वस्थ करायची. समाजसुधारण्याच्या गप्पा करणारे लोक साधा घरातला नळ दुरूस्त करत नाहीत ही गोष्ट त्यांना सहन होत नव्हती. म्हणून ते उपदेश करत बसले नाहीत.
                                    
ऐका सकाळी प्लंबर ला घेऊन ते निघाले नळ दुरूस्तीच्या मोहीमेला आणि त्या दिवसा पासून आबिद सुरती गेले कित्येक वर्ष दर रविवारी हे काम ते स्वखर्चाने करतात. रस्त्याच्याकडेला अतिशय गरीबीत बालपण गेलेले आबिद सुरती पाण्याचे महत्व जाणून होते. तासंनतास आई हांडाभर पाण्यासाठी कशी रांगेत उभी राहायची हे त्यांनी बघीतल होत. म्हणून पाण्याचा थेंब जरी वाया गेला तरी ते अस्वस्थ होतात. पण आज पाणी टंचाई आहे म्हणून सगळे अश्रु गाळत बसले तसं त्यांनी केलं नाही. लोक जमवून भाषण देत बसले नाहीत. Drop dead foundation ही त्याची संस्था म्हणजे one man army आहे.

दर रविवारी एक प्लंबर आणि एक साहाय्यक स्त्री घेऊन ते नवनविन घरांमध्ये जातात. लोकांच्या परवांगीने त्यांच्या घराचे नळ दुरूस्त आहेत का ते तपासतात. लिकेज असेल तर त्वरित बंद करून दिल जात. आणि ते ही पुर्णपने मोफत. आश्या प्रकारे आबिद सुरती या एका माणसाने आजवर लाखो लिटर पाणी वाचवलय. आणि ते ही एकट्याच्या बळावर आणि स्वखर्चाने. ही खुप मोठी जलक्रांती आहे. पाण्याचे वाया जानारे थेंब ही दुःखी माणसाचे आश्रू पुसने एवढच महत्त्वाचे काम आहे. आबिद सुरती यांच्या कार्याला सलाम. शाहरूख खान च्या शब्दातच सांगायच झालं आबिद सुरती हे देवदूत आहेत.
 
ते असे का करतात?
           
 “ कारण आमच्या कुटूंब सर्वकाही गमावल होत. आज या उत्कट मानसाच्या आत्म्यात आणि इच्छाशक्तिला कधीही रोखले नाही, ज्यांचा भूतकाळ त्याने हाती घेतलेल्या अविश्वसनीय सेवेमध्ये मोठा वाटा आहे. Drop dead सोबतचा प्रवास त्यांचा कसा सुरू झाला. त्याचा विचार आणि ॲबिड आपल्याला सांगते..... तो बालपणाचा आघात होता. पाण्याच्या प्रत्येक  थेंबासाठी लढा होता, आम्हाला प्रत्येक बाल्टीसाठी संर्घष करावा लागला. आणि तो वारसा माझ्याकडेच राहिला. एकदा मी एका मित्र आणि मी एका ठिकाणी गेलो तेव्हा मला नळ गळताना दिसला, ते पाहून खुप दुःख झाले.” 
 तो गळत असलेला नळ त्याला खुप त्रास देत होता, तेव्हापासुन आबिद थांबत नाहीत. Drop dead foundation च्या अस्तित्वाच्या पहील्या वर्षात, मीरा रोड वरील १६६६ घरांना त्यांनी भेट दिली. ४१४ नळ ठिक करून त्यांनी ४.१४ लाख लिटर पाण्याची बचत केली.
आबिद सुरती ते त्यांच्या प्रतिक्रिया सांगतात की, “ गावा गावातून मला पत्र मिळाले की आमच्या गावामध्ये चालू करतोय. एकदा मी वर्तमान पत्रात वाचले की आपल्या दरवाज्याची घंटी कोण वाजवत असेल आणि तुम्ही दरवाजा उघडता, आणि तुमच्या समोर विलन उभा असेल तर तुम्ही घाबरू नका. तो तुमची सेवा करण्यासाठी घरचे नळ ठीक करण्यासाठी आला आहे. की पाणी वाया जावू नये म्हणून. पहिला माझ्या घराजवळ पक्ष्यांचा मोठाच्या मोठा थवा यायचा पण आता एक पक्षी कधीतर दिसतो. आपण त्याच्याविषयी विचार केला पाहीजे त्याच्यावर काम केलं पाहीजे. काही लोक करत आहेत. एक पाण्याचा ठेंब वाया जातेय तर एका महिण्यात एक हजार लिटर पाणी गटारीत वाहून जातय. तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचंय, की पाणी वाचवन पाणि वाया घालवून न देणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.”

Tuesday, May 12, 2020

स्थापत्य अभियांत्रिकी

 स्थापत्य अभियांत्रिकी ही सर्वात जुनी अभियांत्रीकी शाखा आहे. यांत नागरी आयोजन, बांधकाम, आणि बांधलेल्या इमारतीचे अनुरक्षण व इतर सामाजीक प्राधिकरण संबंधित क्षेत्रे येतात. पृथ्वी, जल, किंवा संस्कृती आणि त्यांच्या क्रिया यांच्या संबंधित असलेल्यानेच इंग्रजीत याला ‘सिव्हील’ म्हटले जाते. आजच्या याच्या क्षेत्रात पाणीपुरवठा मलनिःस्सारण, पूर व्यवस्थापन आणि वाहतूक याचा ही अंतर्भाव होतो. थोडक्यात स्थापत्य अभियांत्रिकी असे क्षेत्र आहे की जे आपल्या विश्वाला, राहत्या जागेला अधिक सुखकर बनवण्यास मदत करते.


स्थापत्य अभियांत्रिकीचा इतिहास

स्थापत्य अभियांत्रिकी हे भौतिकशास्त्रातिल नियंमांचे उपयोजन असुन याचा इतिहास भौतिकशास्त्र आणि गणिताच्या सखोल अध्यायानाशी संबंध दाखवतो. स्थापत्य अभियांत्रिकी हा भव्य व्यवसाय असल्यामुळे या शाखेचा इतिहास संरचनात्मक, अभियांत्रीकी, पदार्थविज्ञान, भुगोल, भूगर्भशात्र, मृदा यांत्रिकी, जल, विज्ञान, पर्यावरण, उपयोजित यंत्रशात्र संबंधित आहे.


पुराणकाळापासून रचना आणि बांधकामाचे बहुतेक कार्य हे शिल्पकार आणि सुतार यांच्यासारख्या कारागिरांनी केले. उत्तरोत्तर काळात चतुर बांधकाम कारागिराची गरज वाढत गेली. बांधकामासंबंधित माहिती आणि तंत्रज्ञान हे अश्या कारागीरांच्या संघटनेत जतन केले जात असे. इमारती, रस्ते आणि इतर बांधकाम हे पुन्हा पुन्हा त्यांच पद्धतींनी बांधले जात होते. आणि त्याची मागणी खूप जास्त प्रमानात वाढत होती.

भौतिकशास्त्र्यातील आणि गणितातील उदाहरणांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून त्यांचा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये वापर करून घेण्याचे पुरातन उदाहरण म्हणजे आर्किमिडीजच्या सिध्दांताचा, ज्यामुळे आपण उल्हासित वृत्ती समजून घेऊ शकतो तसेच काही समस्यांच्या व्यावहारीक निवारणांचा समावेश होतो. ब्रम्हगुप्त या भारतीय गणितज्ञाने सातव्या शतकात उत्खननाच्या परिनामाच्या आकडेमोडीसाठी हिंदू-अरेबिक अंकावर अवलंबून असणाऱ्या अंकगणिताचा वापर केला होता.

Sunday, May 10, 2020

विलिस टाॅवर

विलिस टाॅवर ही अमेरीकेच्या शिकागो शहरातील गगनचूंबी इमारत आहे. विलिस टाॅवर अमेरीकेतील सर्वात उंच इमारत आहे. ह्या इमारतचे बांधकाम १९७४ साली पूर्ण झाले व तेव्हापासून १९८८ पर्यंत विलिस टाॅवर जगातील सर्वात उंच इमारत होती. ह्या इमारतीत १०८ मजले आहेत व एकूण उंची ४४२ मीटर आहे. जेव्हा ही इमारत बांधली गेली त्यावेळी ही जगातील सर्वात उंच इमारत होती. या इमारतीचे पूर्वीचे नाव ‘सिअर्स टाॅवर’ असे होते. पण २००३ मध्ये ‘सिअर्स, रिबक &कं.’ चे ‘सिअर्स’ नावाचे अधिकार संपले पण नविन नाव काही लागले नाही. मार्च  २००९ मध्ये ‘विलिस ग्रुप होल्डिंग ली.’ या लंडनमधील कंपनीने यांचे अधिकार घेतले आणि दि. १६ जुलै २००९ रोजी सकाळी १० वाजता याचे नाव ‘विलिस टाॅवर’असे अधिकृत रित्या बदलले. जगातील असंख्य ‘सिअर्स टाॅवर’ च्या चाहत्यांसाठी हा एक धक्का होता.

इतिहास

‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ ही कंपनी इ.स. १९६० साली जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी होती. त्यांची अनेक ॲाफिसे शिकागो शहरामध्ये पसरलेली असुन त्यात त्याकाळी ३,५०,००० लोक काम करत असत. ‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ च्या उच्च अधिकाऱ्यांनी आपले सर्व कर्मचारी एकाच ठिकाणी कामास बसतील, अश्या वास्तुरचनेवर विचार करण्यास आरंभ केला. या कल्पनेतुन पुढची पावले टाकले गेली या इमारतीचे चित्र तयार झाले.
                                                                                              
कंपनीचा भविष्यकालीन विस्तार लक्षात घेता साधारण ३० लाख चौरस फूट एवढी जागा लागेल असा अंदाज करून विचार चालू झाला. भविष्यकालीन विस्तार होईपर्यंत मोकळी असलेली जागा छोट्या व्यावसायीकांना देण्याचा विचार झाला. त्यांना ती जागा परवडायला हवी असेल तर जागा लहान हवी. जागा लहान पण खिडक्या आणि बाहेरचे दृश्य मात्र चांगले दिसायला हवे, यासाठी प्रत्येक मजल्यावर कमी क्षेत्रफळाची पण जास्त उंच अशी इमारत बनवण्याची कल्पना पुढे आली. ९ मोठ्या नळ्या एकत्र करून जशी भौमितीक आकृती, तसे एक चित्र तयार झाले. सर्वात खाली ५५००० चौरस फूट आणि हळूहळू वरती कमी होत जाणारे क्षेत्रफळ असे चित्र करताना ही इमारत १०० मजल्याहून अधिक उंच होणारं अस लक्षात आले.
                                                                                   
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या नियमाचे पालन करत इ.स. १९६९ साली यांचे काम सुरू झाले आणि मे इ.स. १९७३ ला पुर्ण झाले. त्याकाळी या इमारतीला १५ कोटी अमेरीकन डाॅलर खर्च आला होता. हा सर्व खर्च ‘सिअर्स, रिबक ॲंड कं.’ ने उचलला होता. इ.स. १९८२ साली २ ॲंटेना तेथे बसवण्यात आले त्यामुळे त्याची उंची १७०७ फूट झाली. दूरचित्रवाणी प्रसारण चांगले होण्यासीठी नंतर तिथे एक ॲंटीना अवाढविल्यानंतर ती १७३० फूट अर्थात ५२७ मीटर झाली.

पर्यटन सुविधा

या इमारतींचा १३५३ फूट उंचीवर असलेला १०३ वा मजला सार्वजनिक रित्या खुला असुन तिथे पर्यटकांना नेण्यासाठी २६ फूट प्रतिसेकंद या वेगाने चालणारी लिफ्ट आहे. या मजल्यावरून भोवतालचे विहंगम दृश्य न्याहाळण्यास ‘द स्काय डेक’ नावाने ओळखली जाणारी गच्ची आहे. आकाश स्वच्छ असेल, तर या गच्चीवरून शिकागो शहर व परीसरातला ५० मैल एवढ्या अंतरापर्यंतचा प्रदेश पाहता येतो. ईल्लिनोइस, इंडियाना, मिशिगन आणि विस्काॅन्सिन या ४ राज्यांतील बराचसा प्रदेश नजरेच्या टप्यात येतो.

                                            
या गच्चीवर पर्यटकांना उंचीवरील थरार अनुभवण्यासाठी संपूर्णतः काचेची बाल्कन्या बांधल्या आहेत. जानेवारी २००९ मध्ये यांचे काम चालू झाले. सुमारे ४ फूट बाहेर काढलेल्या या ३ बाल्कन्या संपुर्णपणे काचेच्या बनवल्या आहेत. प्रत्येक बाल्कनीत ५ टन वजन घेण्याची क्षमता आहे. २ जुलै २००९ रोजी या बाल्कन्या सार्वजनिक वापरासाठी खुल्या करण्यात आल्या.

Friday, May 8, 2020

हरनाम कौर


                                   

महिलांच्या शरीरावर केस फक्त आणि फक्त डोक्यावर बघायला भेटतात, म्हणून शरीरावरचे नको असलेले केस काढण्यासाठी महिला ब्युटी पार्लर मध्ये पैसे खर्च करून त्यांच दुखन सहन करते. आणि अजुन छान दिसण्यासाठी सर्जरी करून घेते. परंतु आपल्या देश्यामध्ये एक माॅडेल आहे तिला दाडी आणि मिशी येते. आणि त्याच्यासाठीच ति ओळखली जाते.

आपण बोलत आहे ती माॅडेल हरनाम कौर हिला लोक दाडी वाली माॅडेल म्हणतात. हरनाम ला स्वतःच्या दाडीची लाज नाही वाटत पण गर्व वाटतो. शेवटी हरनाम ला दाडी का आहे? आणि काय आहे कहाणी तिला सफलता मिळण्याची….

पोलीसायटीक सिंड्रोम आजार झाला होता
                                 
हरनाम कोर ला ११ व्या वर्षी  कळाले की तिला पोलिसायटीक सिंड्रोम हा आजार झाला आहे. त्याच्यामूळे तिच्या शरीरामध्ये हार्मोनल चेंजेस होत होते, म्हणून तिच्या शरीरावर पुरषांसारखे केस उगवत आहेत 

हारली नाही ती

हरनाम कधीच आयुष्यात हरली नाही तिने जिद्दीने सगळ्या गोष्टींचा सामना केला. तिने स्वतःच्या शरीरावर आलेल्या केस कधीच वैक्स नाही केले. आणि तिने ते केस वाढवले.

रचली एक नविन सुंदरतेची परीभाषा

मोठी झाल्यानंतर हरमन ने अस प्रोफेशनची निवड केली की तिथे फक्त सुंदरता पाहीजे असते. तिने माॅडलिंग करायला सुरवात केली

हरमन ने बदलले विचार
                          
स्वतःच्या विचाराने आणि मेहनतीने तिने माॅडल्स चे विचारच बदलून ठेवले. तिने सेलेब्रिटी ज्वेलरी डिजाइनर मैरीयाना हरूटूनिएन च्या शो मध्ये कैट वाॅक केला.

स्वतःच्या जिवावर जिंकुन घेतले जगाला



हरनाम कौर आज फक्त बोलण्याचा विषय नसून तिच्या घरातल्यांचा गर्वाचा विषय आहे. हरनाम कौर ही एक आत्मविश्वासी आणि काबील महीला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड

आयकाॅनिक गिनीज वर्ल्ड रेकाॅडने आपली ६२ वी आवृत्ती प्रकाशीत केली आहे. या वेळी जगभरातील चार हजाराहून अधिक आश्चर्यकारक नोंदीचा या आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे, परंतु सर्वात अनोखा विक्रम दाढी मिशी असलेल्या महीलेचा, हरनाम कौर आहे.
                                 
स्वतःला ओळखायला आले पाहीजे

हरनाम म्हणली की “पहिला लोक माझी चेष्टा करत होते. तेच लोक आता माझी इज्जत करतात. मी महीलांना फक्त एवढच सांगेन दूसऱ्यांसाठी नाही तर स्वतः साठी जगायला शिकले पाहिजे. आपले विचार बरोबर असतील तर कोणाच्यातरी लाख बोलण्याने तुमची सफलता कोणी थांबवू नाही शकत.”

Wednesday, May 6, 2020

लढाऊ विमान


एक लढाऊ हे प्रामुख्याने इतर विमानाच्या विरोधात हवेतल्या हवेत लढण्यासाठी रचना केलेले लष्करी विमान आहे. या लढाऊ विमानाचा मुख्य उद्देश रणांगणात हवाई प्राबल्य प्रथापित करण्यासाठी आहे. हे बाॅंबफेकी विमाने (bombers) आणि इतर विमाने ज्यांचे मुख्य ध्येय जमीनीवर हल्ला आहे अशा हल्ला विमानांपेक्षा निराळे असते. तरी अनेक विमानांना जमिनीवर हल्ला करता येईल अशी दुय्यम क्षमता असते. काही विमाने अनेक हेतू सैनिक हाताळणी आणि बाॅंबफेकी विमाने म्हणूनही रचना केलेली आहेत. यामुळे अनेकदा लढाऊ विमान अशी मानक व्याख्या पूर्ण अशी आहे. पहिल्या महायुद्धा पासून हवाई प्राबल्य हे परंपरागत युध्दामध्ये विजयासाठी आवश्यक मानले गेले आहे. हवाई सर्वाधिकार प्राप्त करण्यासाठी यशस्वी किंवा अयशस्वी प्रयत्न हे त्या वैमानिकाच्या कौशल्यावर, विमानाच्या वापरावर, रणनीती विमानाची संख्या आणि कार्यक्षमता या अनेक घटकांवर अवलंबून असते. लढाऊ विमाने हे आधूनिक सशस्त्र दलांच्या संरक्षण खर्चाच्या अंदाजपत्रकात एक मोठा भाग व्यापतात.

इतिहास
पहिल्या महायुध्दात या विमानाची सुरवात झाली. आधी ही विमाने खुप लहान आणि हलकी होती. परंतु ती सशस्त्र होती. विमान एका लाकडी सांगाड्यावर बांधले जात असे. त्यास कापड्याने झाकले जात असे. त्यामुळे कमी वजनाचे विमान तयार होते. दुसऱ्या महायुध्दापर्यंत यांत सुधारणा होऊन धातूची विमान बांधली जाऊ लागली यांत मशिन गन बसवल्या जात असत. यांना पंख्याची इंजिने असत. काही विमान ताशी ४०० मैल वेग गाठत होते. यांना एकच इंजिन असत असे. दोन इंजिनांची विमानेही बांधली गेली पण तेव्हीढी कार्यक्षमता नव्हती. इ.स. १९५० नंतर या विमानांना रडार लावण्यास आले. त्यामुळे वैमानिक दूरवर पाहू शकत होते. १९६० नंतर मशिन गन्स जाऊन त्यात हवेतल्या हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जाऊ लागली.

 
स्टेल्थ फायटर 
स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे विमाने रडारपासुन काही प्रमाणात तरी लपून राहू शकतात. स्टेल्थ फायटर विमानाच्या पृष्ठभागावर खास पदार्थाचे आवरण दिलेले असते. हे आवरण रेडिओ लहरी शोषून घेतात. तसेच सर्वसाधारण विमानाप्रमाणे स्टेल्थ विमानाची इंजिने बाहेर नसतात. ती लपविलेली असतात. स्टेल्थ तंत्रज्ञान रडार विमान ओळखण्याची शक्यता कमी असते.

भारत
भारताचेही लढाऊ विमान बनवण्याचे प्रकल्प सुरू आहेत. रशियाच्या सुखोई आणि भारताच्या हिंदूस्तान एरोनाॅटिक्स लिमिटेड या कंपन्या मिळून नवीन स्टेल्थ विमान बनवत आहेत. याला सुखोई-हाल FGFA -फिफ्थ जनरेशन फायटन एअररक्राफ्ट असे नाव देण्यात आले आहे. या शिवाय आडव्हास मीडियम काॅंबॅट एअरक्राफ्ट हे भारत स्वतःच्या बळावर पाचव्या पिढीतील स्टेल्थ लढाऊ विमान बनवत आहे.

Monday, May 4, 2020

सांगकाम्या


सांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्र मानव असेही म्हणतात. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळून येतो.

उपयोग


यंत्रमानव सांगकाम्याचे अनेक उपयोग आहेत. हे प्रामुख्याने तीच ती कामे करण्यास उपयोगी पडतात.हे सांगकामे यंत्रमानव शक्तीची कामे कमी वेळात करू शकतात. मोटार वाहन उद्योगात हे सांगकामे प्रामुख्याने जुळणीची कामे वेगाने करण्यासाठी वापरतात. हे ‘औद्योगिक’ सांगकामे यंत्रमानव आहेत. संरक्षण विभाग आणि लष्कर स्पोटके शोधण्यासाठी आणि निकामी करण्यासाठी सांगकामे यंत्रमानव वापरतात. कारण यांत काही अपघात घडून मानव जीव जात नाही. काही सांगकामे घरगुती कामातही मदत करतात.जसे की घरीच स्वच्छता करणे. ठराविक भागातील गवत कापणे. अंतराळ क्षेत्रात यांचा उपयोग होतो. जसे मंगळ ग्रहावर सांगकामे यंत्रमानव उतरून तेथील वातावरणाचे संशोधन केले जाते. या सांगकाम्याना फक्त आज्ञावली मार्फत दिलेले कामच करता येते. त्यांची निर्मिती अनेकदा एका प्रकारचे काम करण्यासाठी झालेली असते.
स्वरूप
सांगकामे यंत्रमानव हे मानवी स्वरूपात दिसतील असे नाही. यांना हात, पाय, डोळे आदी अवयव सदृश सेन्सर्स असलेच पाहीजेत असे नसते. हे सांगकामे निरनिराळ्या स्वरूपात असू शकतात. यांना कामासाठी आवश्यक असलेले अवयवच जोडलेले असतात जसे की यांत्रिक हात.

सध्या काळात हा सागकाम्याची खुप मदत होताना दिसते. पुर्ण जगभरात कोरोना असल्यामुळे काही लोक कामावर जातात काही घरीच आहेत. पण याच कोरोनाच्या काळात हेच सांगकामे आपली मदत करताना दिसतात. अशीच एक घटना केरळ मध्ये घडली आहे.

जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या या प्राणघातक कोरोनाव्हायरस विषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केरळमध्ये एक अनोखी कल्पना समोर आली.

केरळ स्टार्टअप मिशन (केएसयुएम) नावाच्या सहकारी एजन्सीने मुखवटा, सॅनिटायझर्स वाटप करणारे आणि जीवघेणा रोगाबद्दल लोकांना शिक्षित करणारे दोन रोबोट बाजारात आणले आहेत.

असीमोव रोबोटिक्स विकसीत केएसयुएम काॅम्प्लेक्समध्ये हे दोन रोबोट कार्यरत आहेत. एक रोबोट मुखवटे आणि सॅनिटायझर्स वितरित करीत असताना, दुसरा धोका टाळण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ॲार्गनायझेशनच्या मोहीमेविषयी तपशिल करतो.













रोबोट इतर कामे ही करतात जसे की दरवाजा साफ करणे आणि कोरोनाव्हायरसच्या प्रश्नाना उत्तर देणे.

सगळेजण आपली कामे नियमाने पार पाडत आहेत. ते डाॅक्टर असो वा पोलीस. थोडी साथ आपणही देऊया. घरात राहूया, आणि सुरक्षित राहूया.

Saturday, May 2, 2020

आंतरराष्ट्रीय कामगार दिन


महाराष्ट्र दिन दरवर्षी १ मे रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिन देखील या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोकांना सुट्टी असते. १ मे १९६० ला महाराष्ट्र दिन म्हणून जाहीर केले गेले. आणि मुलांच्या शाळेचा निकालाचे दिवस असतो. त्यांना १५ दिवस आधी जरी सुट्टया दिल्या असल्या १ मे ला शाळेत जावच लागत. त्यामुळे शिक्षकांना ही सुट्टी नसते. असो…..

भारत

                                              
चेन्नई येथे भारतातील पहिला १ मे कामगार दिन म्हणून १ मे १९२३ रोजी साजरा केला गेला. त्या वेळेस तीथे मद्रास डे म्हणून ओळखले जात असे. याची सुरवात भारतीय मजदूर किसान पक्षाचे नेते कारमेड सिंगरावेलू चेट्यार यांनी केली. भारतात उच्च न्यायालयासमोर एक मोठे प्रर्दशने आणि एक मोठा ठराव मंजूर करून हा दिवस भारतात कामगार दिन म्हणून साजरा करावा आणि या दिवशी सुट्टी जाहीर करावी यांवर एकमत झाले. हा दिवस १ मे रोजी भारतासह सुमारे ८० देशांमध्ये साजरा केला जातो. यामागील कारण म्हणजे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून ओळखला जातो.

महात्मा गांधी
            
माहात्मा गांधी म्हणाले होते की देशाची प्रगती त्या देशांतील कामगार आणि शेतकऱ्यावर अवलंबून असते. उद्दोगपती, मालक, किंवा व्यवस्थापक मानण्याएवजी ते स्वतःला विश्र्वस्त म्हणून करू लागले. लोकशाही रचनेत सरकार लोकांच्या वतीने देखील निवड केली जाते. जे राजकीय लोकांना त्यांच्या देशांचे विश्र्वस्त म्हणून सोपवतात. व्यवस्थापनासाठी शांतता व कायदेशीर व्यवस्था राखण्यासाठी कामगार व शेतकरी यांचे कल्याण व विकास करऱ्यासाठी ते वचनबध्द आहेत. मोठ्या संख्येने कामगार व शेतकरी यांचे राज्य कार्यात मोठे योगदान आहे. औद्योगिक शांतता, उद्दोजक आणि कामगार यांच्यात शांततापुर्ण आणि कौटुंबिक संबंध राखणे ही सरकारची भूमिका आहे,

महाराष्ट्र
                                      
त्यांच दिवशी १ मे ला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. कामगार दिन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात साजरा केला जातो. येथील सर्व व्यापारी आणि कारागीर सुट्टीवर जातात.

आंतरराष्ट्रीय कामगार दीनाच्या दिवशी आम्ही मजुरांच्या कर्तुत्त्वाविषयी बोलतो, परंतु त्यानंतर आपण विसरून जातो की आज आपण आपल्या घरात बसून आराम घेतो. काही फरक पडत नाही की बाहेर काय चाललंय. आपण त्याच्याबद्दल विचार केला पाहीजे अशी वेळ आली आहे की आपण या कठीण वेळी त्यांना सात दिली आणि कठीण परिस्थितीत त्यांचे समर्थन केले, आणि त्यांचा सन्मान केला पाहीजे आणि कृपया आदर द्दा….